शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

बाई मला...नोकरीवाला नवरा हवा गं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:24 AM

शेती करणाऱ्या मुलगा असेल तर मुली साफ नकार देऊ लागल्याने एक नवीच समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.

- अरुण वाघमोडे अहमदनगर : वंशाला दिवाच हवा, या भाबड्या समजुतीमुळे मुलांच्या संख्येपेक्षा मुलींची संख्या कमी झाली असतानाच; बदलत्या जीवनशैलीमुळे उपवर मुलींच्या अपेक्षा वाढल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांचे विवाह जमविणे महाकठीण होत असल्याचे वास्तव सध्या ठळकपणे दिसू लागले आहे. शेती करणाऱ्या मुलगा असेल तर मुली साफ नकार देऊ लागल्याने एक नवीच समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.एकेकाळी मुलीला अपेक्षित नवरदेव शोधण्यासाठी तिच्या माता-पित्यांना मोठा आटापिटा करावा लागायचा़ चांगला मुलगा मिळालाच तर त्याच्या अवास्तव अपेक्षा असायच्या़ लेकीच्या चांगल्या भविष्यासाठी तिचा पिता मुलाची सर्व हौसमौज पूर्ण करायचा़ गेल्या काही वर्षांत मात्र ही परिस्थिती पूर्ण बदलून गेली आहे़आता मुलींना हुंडा देऊन लग्न करण्याची वेळ मुलांवर आली आहे़ त्यातही मुलगा नोकरीवाला अन् सुस्थापित असेल तरच मुलगी लग्नाला तयार होतात. किती एकर शेती आहे आणि त्यातून किती उत्पन्न येते, याचा अजिबात विचार केला जात नाही. दुसरीकडे शहरात नोकरी आणि खोली असेल तर अशा मुलाला ताबडतोब होकार मिळतो. यामुळे शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य मुलांची लग्ने जमविणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे.नगर जिल्ह्यात १ हजार पुरुषांमागे ९०८ महिला असे प्रमाण आहे़ महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे़ एकतर मुलींची संख्या कमी शिवाय शिक्षणाचे वाढते प्रमाण, बदललेली जीवनशैली, जोडीदार निवडताना वाढलेल्या अपेक्षा आदी कारणांमुळे मुलांना नाकारले जात आहे़ अल्पसंख्याक समाजासह मराठा व इतर अठरा पगड समाजामध्ये सध्या असेच चित्र आहे.मुलगी सावळी अन् शिक्षणाने कमी असेल तर मुले अशा मुलींना नकार द्यायचे. आता मुली अशामुलांना नकार देत आहेत़ मुलगी नोकरीला असेल तर ती मुलगा नोकरीवालाच शोधते़ मराठा सेवा संघाच्या वधू-वर सूचक मंडळातंर्गत गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या सर्व्हेत २५ पेक्षा जास्त वय असलेल्या ४० टक्के मुलांचे विवाह झालेले नाहीत, असे आढळून आले आहे.>काय आहेत ‘ती’च्या अपेक्षा?मुलाला चांगल्या पगाराचीनोकरी असावीत्याचे स्वत:चे शहरात घर असावेशेतकरी मुलगा नकोमुलाकडे स्वत:ची कार असावी

टॅग्स :marriageलग्न