शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

अहमदनगरमधील मन्याळे गाव पाणीटंचाईने झाले ओसाड, पहावी लागते टँकरची वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 4:41 AM

अकोले तालुक्यातील कोतूळ व ब्राम्हणवाड्याच्या मध्यावर दोन हजार लोकसंख्येचे मन्याळे गाव. पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना दरवर्षी टँकरची वाट पहावी लागते.

- मच्छिंद्र देशमुखकोतूळ (जि. अहमदनगर) : अकोले तालुक्यातील कोतूळ व ब्राम्हणवाड्याच्या मध्यावर दोन हजार लोकसंख्येचे मन्याळे गाव. पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना दरवर्षी टँकरची वाट पहावी लागते. धड गुरेही पाळता येत नाहीत. मुलांची लग्नही जमेनात. पाच वर्षापूर्वी ८५ लाख रूपयांची पाणी योजना परत गेली. लालफितीच्या कारभाराने गाव मरण यातना भोगतेय.मन्याळे हे दरवर्षी टँकर मागणारे व शासकीय अनास्थेचे बळी ठरलेले गाव. गावातील तलाव डिसेंबरमध्येच आटतो. कूपनलिका देखील जानेवारीत कोरडी होते. फेब्रुवारीत दरवर्षी गावात टँकर येतो. गावात दोन हजारांवर बॅरल आहेत. पिण्यासाठी व जनावरांना हेच पाणी पाच महिने वापरावे लागते. गावात पाणी नसल्याने मुलांची लग्न होत नाहीत. मराठा समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले.पिण्याच्या पाण्यासाठी खोल विहिरीत अक्रूर हांडे हा शेतकरी व एका दहा वर्षांच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला. मन्याळे गावासाठी २०१२ ला राष्ट्रीय पेयजल योजनेतून वाघापूर गावातील मुळा नदीवरून ८५ लाख रूपयांची योजना मंजूर झाली. पैसेही आले. मात्र अचानक वाघापूर गावातील काही लोकांनी योजना बंद केली. त्यात ग्रामसेवकाने वर्कआॅर्डर लवकर न दिल्याने योजना बंद पडली. पैसेही परत गेले.अनेकांना निवेदने दिली. तहसीलसमोर महिलांनी आंदोलन केले. मात्र गावाला पाणी मिळालेच नाही.राज्यात १,२०७ चारा छावण्या झाल्या सुरूपुणे : दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील १० जिल्ह्यांत एकूण १ हजार २०७ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यात लहानमोठ्या ८ लाख ४ हजार ३२० पशुधनाचे संगोपन केले जात आहे. काही भागात चारा उपलब्ध आहे. मात्र, पाणी उपलब्ध नसल्याने पशुधन छावण्यांमध्ये दाखल केले जात असून दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने पुढील काळात चारा छावण्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता पशुसंवर्धन आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने महसूल विभाग, स्वयंसेवी संस्थांकडून आणि राहत शिबीर म्हणून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAhmednagarअहमदनगर