शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

तंबाखूजन्य पदार्थांमुळे ४० टक्के रुग्णांना कॅन्सर; सतीश सोनवणे यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:35 PM

भारतात दरवर्षी निष्पन्न होणा-या एकूण कॅन्सर रुग्णांपैकी ४० टक्के रुग्णांना केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होत आहे. तोंडाचे व घश्याचा कॅन्सर अगदी सुरुवातीच्या स्तरावरच लक्षात येऊ शकतो़. अशावेळी वेळेत निदान करून उपचार केले तर या व्याधीचा पुढील धोका टळू शकतो, असे मत येथील कर्करोग तज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे यांनी मुख कर्करोग दिनानिमित्त ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अहमदनगर : कर्करोगाची अनेक कारणे आहेत. मात्र तंबाखूजन्य पदार्थ आणि दारु यामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. तोंडात पांढरा चट्टा  किंवा लाल चट्टा होणे किंवा तोंडाची उघडिप कमी होणे (सबम्यूकस फायब्रोसिस) आदी लक्षणे दिसत असल्यास भविष्यात कॅन्सरमध्ये रुपांतरीत होण्याचा धोका असतो. अशावेळी कॅन्सरतज्ज्ञांचा नियमित सल्ला घेणे आवश्यक आहे.

वेळेवर या व्याधींवर शस्त्रक्रिया झाल्यास कॅन्सरचा धोका ब-याच अंशी कमी होऊ शकतो. तोंडातील साधारण जखमा वेदनादायक असतात. परंतू ५ ते ७ दिवसांत भरतात. परंतु तोंडातील जखम २ आठवड्यांपेक्षा अधिक वेळेत भरत नसेल व अल्प वेदनादायी असेल तर वेळेवर तज्ज्ञांचा सल्ल घेता पाहिजे. दुर्लक्ष झाल्यास तोंडातील कॅन्सरचा शिरकाव मानेतील लसिकाग्रंथीमध्ये होऊन मानेतही गाठ हळूवारपणे वाढत जाते. ही गाठ सुध्दा दुखत नसल्याने पुन्हा दुर्लक्ष संभवू शकतो. 

कॅन्सरतज्ज्ञांच्या तपासणीत गाठ प्राथमिक स्तराची असेल तर स्कॅनची गरज नाही. परंतु वाढीव स्तरावर सिटी स्कॅन किंवा एमआरआय करण्याची गरज असते. कॅन्सर फुफ्फुसात पसरण्याचा धोका असल्याने सोबत फुफ्फुसात सिटी स्कॅनही केला जातो. स्तर जाणून घेण्यासाठी पेट स्कॅन करण्याची गरज नाही.

कॅन्सर मानेतील लसिकाग्रंथी मध्ये पसरलेला असतो आणि त्याचा उगम कळून येत नाही. तेव्हा पेट स्कॅन करणे गरजेचे असते़ प्रत्यक्षात कॅन्सर होऊच नये, यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळी घेणे गरजेचे आहे. व्यसमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे असे डॉ़. सोनवणे यांनी सांगितले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcancerकर्करोगdoctorडॉक्टरinterviewमुलाखत