शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

परीक्षेस प्रवेश नाकारलेला ‘तो’ विद्यार्थी अखेर उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 10:38 AM

हजेरी कमी असल्याने दहावीच्या परीक्षेस बसता येणार नाही, असा पवित्रा सीबीएसई बोर्डाने घेतल्यानंतर त्याविरोधात पालकांनी कणखर भूमिका घेत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : हजेरी कमी असल्याने दहावीच्या परीक्षेस बसता येणार नाही, असा पवित्रा सीबीएसई बोर्डाने घेतल्यानंतर त्याविरोधात पालकांनी कणखर भूमिका घेत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयानेही अवघ्या दोन दिवसांत सुनावणी घेऊन आदेश दिला. परीक्षेच्या आधी काही तास विद्यार्थ्याचे हॉलतिकीट आले, त्याने परीक्षा दिली अन् सोमवारीलागलेल्या निकालात तो विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाला. एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतर यश मिळतेच, हेच या उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे.यश भारत झेंडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. यश नगर शहरातील एका इंग्रजी शाळेत दहावीला शिकत होता. परंतु दुर्धर आजारामुळे तो शाळेतील हजेरी पूर्ण करू शकला नाही. त्याची हजेरी केवळ ४६.७९ टक्केच भरली. परीक्षेसाठी ७० टक्के हजेरी आवश्यक असते. त्यामुळे सीबीएसई बोर्डाने त्याला परीक्षा देण्यास शाळेला नकार दिला. परंतु या निर्णयाने ना यश डगमगला ना त्याचे आई-वडील.यशच्या आई शीला या बीएसएनएलमध्ये नोकरीस आहेत, तर वडील भारत हेही नोकरीला आहेत. त्यांनी ५ मार्च २०१९ रोजी सीबीएसई बोर्डाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखलकेली. विशेष म्हणजे यशची दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होणार होती. दोन दिवसांत न्यायालयात सुनावणी होऊन निकाल व त्यानंतर परीक्षेचे हॉलतिकिट मिळणे या बाबी केवळ अशक्यप्राय होत्या.परंतु झेंडे परिवाराच्या वतीने चारूता देशमुख यांनी केलेल्या प्रभावीयुक्तिवादामुळे न्यायालयाने त्वरित सुनावणी घेऊन एकाच दिवसात निकाल देत यशला त्वरित हॉलतिकीट देण्याचा आदेश सीबीएसई बोर्डाला दिला. त्यामुळे परीक्षेच्या दोन तास आधी यशला हॉलतिकीट मिळाले व तो परीक्षेस पात्र झाला.या सर्व द्राविडी प्राणायामानंतर त्याने चिकाटीने अभ्यास केला. यशच्या आई शीला यांनी तीन महिने सुटी घेऊन यशचा अभ्यास घेतला. भाऊसाहेब ढमाळे, यश ओहोळ, सुमीत सर या खासगी शिक्षकांनी त्याच्या घरगुती शिकवण्या घेऊन त्याला मार्गदर्शन केले.६ मे रोजी सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला अन् यश ५१ टक्के मिळवून उत्तीर्ण झाला.केवळ नियमावर बोट ठेवून चालत नाही.यंत्रणेने सारासार व व्यापक विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते. या निकालातून अनेक पालकांना प्रेरणा मिळणार आहे. अशा अडचणीच्या स्थितीत घाबरून न जाता धैर्याने तोंड दिले की मार्ग सापडतोच. यश हा शिक्षणासह क्रीडा व इतर क्षेत्रातही अग्रेसर असल्याने न्यायालयाने त्याचा विचार केला. - शीला झेंडे, पालक

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर