शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

निळवंडेची राजकीय कालवा-कालव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:17 PM

निळवंडे कालव्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात राजकीय चढाओढ लागली आहे.

ठळक मुद्देनिळवंडे प्रकल्पास ३०-४० वर्षे लागली.लाभधारक १८२ दुष्काळी गावांचा पाण्याचा प्रश्न.६८ हजार ८७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे आवाहन.

रियाज सय्यदशिर्डी : निळवंडे कालव्याच्या कामाचे श्रेय घेण्यावरून शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात राजकीय चढाओढ लागली आहे. मात्र कालव्यात पाणी आले तरच दुष्काळी १८२ गावे सुजलाम सुफलाम होतील, हेही तितकेच खरे. त्यासाठी राजकारण नव्हे हितकारण होणे अपेक्षित आहे.निळवंडे धरण अकोले तालुक्यात आहे. या धरणाचा डावा कालवा अकोलेसह संगमनेर व राहाता तालुक्यातून प्रस्तावित आहे. अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी बंदिस्त कालव्याची मागणी लावून धरली आहे. तर खा. लोखंडे व आ. विखे हे या कालव्यांच्या कामात येणाऱ्या अडचणींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर असताना ‘लोखंडे-विखे’ हे दोन्ही नेते निळवंडे कालव्याची राजकीय कालवा-कालव करू लागले आहेत. २ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी पारंपरिक पध्दतीने भूमी अधिग्रहण झाल्याचे तांत्रिक कारण देत गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने अकोले तालुक्यात बंदिस्त कालवे होऊ शकत नाहीत, असे स्पष्ट केलेले असताना पिचड मात्र आपली भूमिका सोडायला तयार नाहीत. कालव्यांची कामे बंद पाडली म्हणून दुष्काळी गावातील संतप्त शेतकºयांनी पिचड यांच्या पुतळे दहनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यास अकोलेकरांचा विरोध आहे. पण, गेली ३०-४० वर्षे निळवंडे धरण व कालवे यावर आपली पोळी भाजणाºया राजकारण्यांना निवडणुकांच्या ऐन तोंडावरच हे शहाणपण का बरे सूचले असावे? राजकारण्यांचे चल पुढच्या... तर नसावे? या प्रश्नाची उत्तरे दुष्काळग्रस्त शेतकºयांना आता मिळाले आहे. निळवंडे धरणातून शिर्डी व कोपरगावला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नेण्यास पाटपाणी कृती समितीचा तीव्र विरोध आहे. त्यावर मात्र कुणीही बोलण्यास तयार नाही. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी