शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

शूरा आम्ही वंदिले : मरणाला नाही भ्याला कोंडाजी अमर जाहला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 7:30 AM

‘१९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात पंजाब लगतच्या सरहद्दीवर झालेल्या घनघोर संघर्षात शहीद सैनिक कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर यांना २ आॅक्टोबर १९६५ ला वीरगती प्राप्त झाली.’

‘ मै भारत सरकार और अपनी और से आप के दु:ख में यह संदेश भेज रहा हूँ। भारत की जनता का हृदय भी आप के साथ है। हम सबकी प्रार्थना है कि इस महान शोक में भी आप को धैर्य और शांती प्रदान हो।’ दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे हे पत्र येण्यापूर्वी ७ आॅक्टोबर १९६५ ला रुंभोडीत ‘४७’ शब्दांची तार आली. त्यात संदेश होता.. ‘१९६५च्या भारत पाकिस्तान युद्धात पंजाब लगतच्या सरहद्दीवर झालेल्या घनघोर संघर्षात शहीद सैनिक कोंडाजी लक्ष्मण मालुंजकर यांना २ आॅक्टोबर १९६५ ला वीरगती प्राप्त झाली.’ गावातील अवघ्या २७ वर्षांचा जवान शहीद झाला.. रुंभोडीकरांचं काळीज दुभंगून टाकणारी ही तार.. रुंभोडी-इंदोरीकरांसह मालुंजकर कुटुंबाला दु:खद असली तरी देशासाठी त्यांचे बलिदान कामी आले.अकोले तालुक्यातील मालुंजे गावचे वीरपुत्र शहीद कोंडाजी मालुंजकर यांचा जन्म २० नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. वडील लक्ष्मण व आई सरुबाई यांचे ते एकुलते एक पुत्र. देऊबाई या त्यांच्या बहीण. देऊबाई नऊ वर्षांच्या व ते सात वर्षांचे असताना त्यांचे मातृपितृ छत्र हरपले. पुढे चुलत्यांनी आणि नंतर देऊबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांची बहीण देऊबाई यांचे पुंजाजी नवले यांच्याशी झाले. १९५६च्या दरम्यान देऊबाई यांनी इंदोरी गावातीलच लोहटे कुटुंबातील लहानबाई यांच्याशी कोंडाजी यांचे लग्न लावून दिले. लग्नासाठी कोंडाजी यांनी रोजगारासाठी एकट्याने गाव सोडलं. मुंबापुरी गाठली. मुंबईत पितळी भांड्यांना ‘कलही’ लावण्याचं हंगामी काम ते करत. उंची साडेसहा फूट, रुबाबदार शरीरयष्टी यामुळे ते पोलिसात भरती झाले. पण ही बाब त्यांच्या घरातील लोकांना आवडली नाही. त्यांना तत्काळ नोकरी सोडावी लागली. त्यांनी पुन्हा मुंबई गाठली. पण त्या कामात त्यांचे मन रमेना आणि लग्न झाल्यानंतर चार-पाच वर्षांनी वयाच्या २३ व्या वर्षी २० नोव्हेंबर १९६१ ला ते भारतीय सैन्यदलात भरती झाले.भरती झाल्यानंतर तीन-चार महिने ते घरीच आले नाहीत. घरातील विरोध झुगारून त्यांनी सैन्यदलात दाखल होणं त्यांचे चुलते, काकू यांना आवडलं नाही. त्यामुळे बायकोसह त्यांनी सासूरवाडी गाठली आणि सासूरवाडीचे आधार बनले. सैन्यदलात ते मराठा बटालियन बेळगावमध्ये शिपाई म्हणून सेवा बजावू लागले. १९६५ च्या युद्धात पंजाबच्या सीमावर्ती भागात शत्रूशी लढताना रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास शत्रूची गोळी लागून २ आॅक्टोबर १९६५ रोजी ते शहीद झाले. रुंभोडीतील मेजर दौलत दिनकर देशमुख त्यावेळी सैन्यदलात प्रमुख पदावर होते. त्यांनी ओळख पटल्यानंतर सरकारच्या मदतीने रुंभोडीला तारेने संदेश पाठवला. ही तार पाच दिवसांनी रुंभोडीत दाखल झाली. तो दिवस होता शुक्रवार. त्या वर्षीच्या दसऱ्यानंतरचा दुसरा दिवस. रुंभोडी-इंदोरी दोन्ही जुळी गावं दु:ख सागरात बुडाली. शहीद कोंडाजींवर मृत्यूनंतरचे सर्व सोपस्कार सरकारने पूर्ण केले. मालुंजकर कुटुंबाजवळ केवळ एक तारेचा कागद हीच शेवटची आठवण उरली. ‘१९६५ ला रंगपंचमीचा सण झाल्यानंतर ते सीमेवर गेले़ परत आलेच नाहीत. नवरात्री उत्सवात त्यांना वीरगती प्राप्त झाल्याची बातमी हाती आली. त्यांना वीरगती मिळाली, तेव्हा मुलगा दीपक अवघा दीड वर्षाचा होता, असे लहानबाई सांगत होत्या. त्यावेळी त्यांना आपले अश्रू लपवता आले नाही. लहानबार्इंनी माहेरी राहून एकुलता एक मुलगा दीपक बरोबर आई-वडिलांचाही सांभाळ केला. त्यांना त्यावेळी २७ रुपये पेन्शन मिळत असे. ‘चाकर असावं, पण बेकार नसावं’ हे पतीचं वाक्य लहानबार्इंच्या स्मरणात होतं. पती निधनानंतर पाच वर्षांनी त्यांनी विडी तयार करण्याची कला शेजारी असलेल्या महिलांकडून अवगत करून घेतली आणि विडी कामगार म्हणून काम करीत मुलाला मोठं केलं. शहीद कोंडाजी यांचा मुलगा दीपक यांना दोन मुलं. त्यांचीही लग्न झाली आहेत. दीपक आजोबा आणि वीरपत्नी लहानबाई पणजी झाल्या आहेत.

शिपाई कोंडाजी मालुंजकरजन्मतारीख २० नोव्हेंब १९३८सैन्यभरती २० नोव्हेंबर १९६१वीरगती २ आॅक्टोबर १९६५ (भारत -पाक युद्ध)सैन्यसेवा ३ वर्षे १० महिने १२ दिवसवीरपत्नी लहानबाई कोंडाजी मालुंजकर.शब्दांकन : हेमंत आवारी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Lokmatलोकमत