शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अहमदनगर जिल्ह्यात साडेतीन लाख शेतक-यांना महावितरणचा शॉक; वीज पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 8:10 PM

अहमदनगर/कोपरगाव : सन २०१३-१४ पासून अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ४३६ शेतक-यांनी शेती पंपाच्या वीज बिलापोटी २ हजार २८५ कोटी रूपये थकविल्याने महावितरणकडून त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.२०१३-१४ पासून शेतक-यांनी शेतीपंपांची वीज देयके थकविली आहेत. अनेकदा कळवूनही देयके न भरल्याने नगर जिल्ह्याची थकबाकी २ हजार २८५ कोटींवर ...

ठळक मुद्देथकबाकीची आकडेवारीअहमदनगर जिल्हा - ३ लाख ४१ हजार ४३६ शेतकरी (२ हजार २८५ कोटी थकबाकी)संगमनेर विभाग- एकूण ८० हजार ६७ शेतकरी (५२१ कोटी थकबाकी)कोपरगाव ग्रामीण- १३ हजार ९६३ शेतकरी (६६ कोटी थकबाकी)कोपरगाव शहर- २ हजार २१६ शेतकरी (११ कोटी थकबाकी)राहाता- १४ हजार ९५३ शेतकरी (८२ कोटी थकबाकी)संगमनेर ग्रामीण- २० हजार ९७९ शेतकरी (१८५ कोटी थकबाकी)संगमनेर शहर- १३ हजार ५७० शेतकरी (८९ कोटी थकबाकी)अकोले- १० हजार ३४१ शेतकरी (६२ कोटी थकबाकी)राजूर- ४ हजार ४५ शेतकरी (२१ कोटी थकबाकी)

अहमदनगर/कोपरगाव : सन २०१३-१४ पासून अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ४३६ शेतक-यांनी शेती पंपाच्या वीज बिलापोटी २ हजार २८५ कोटी रूपये थकविल्याने महावितरणकडून त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.२०१३-१४ पासून शेतक-यांनी शेतीपंपांची वीज देयके थकविली आहेत. अनेकदा कळवूनही देयके न भरल्याने नगर जिल्ह्याची थकबाकी २ हजार २८५ कोटींवर जाऊन पोहचली आहे. त्यात कोपरगाव तालुक्यातील १६ हजार १७९ शेतक-यांच्या ७८ कोटी रूपयांच्या थकबाकीचा, संगमनेर विभागातील ८० हजार ६७ शेतक-यांच्या ५२१ कोटी रूपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. संगमनेर ग्रामीणमध्ये सर्वाधिक १८५ कोटी तर राजूरमध्ये सर्वात कमी २१ कोटींची थकबाकी आहे. थकबाकीचे प्रमाण भरमसाठ असल्याने बुधवारी सायंकाळी संगमनेर विभागात महावितरणचे प्रादेशिक संचालक सतीश कर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत थकबाकीदार ग्राहकांच्या शेतीपंपांचा वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शेतीपंपांच्या सर्व रोहित्रांची वीज सायंकाळपासून गायब झाली. थकबाकी असलेल्या देयकाच्या २० टक्के रक्कम भरल्यास वीज पुरवठा करणे महावितरणला शक्य होईल. या बैठकीस मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, कार्यकारी अभियंता डी.बी.गोसावी, उपकार्यकारी अभियंता डी.एन.चावडा(कोपरगाव ग्रामीण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता जे.व्ही. महाजन (कोपरगाव शहर) आदी उपस्थित होते.

थकबाकीदार ७० टक्के शेतकरी ग्राहकांनी देयकाच्या किमान २० टक्के रक्कम भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू केला जाणार नाही. तसेच रोहित्र जळाल्यास ७० टक्के रक्कम भरूनच बदलून दिले जाईल. शेतकºयांनी वेळेत वीज देयके भरून महावितरणला सहकार्य करावे.-डी.बी.गोसावी, कार्यकारी अभियंता.

१५ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शेती पंपांवर कॅपिसिटर बसविण्यात येणार आहेत. कॅपिसिटरमुळे वीज गळती थांबण्यास मदत होईल. अतिरिक्त वीज वापर नियंत्रणात येईल. त्यासाठी किमान ७० टक्के थकबाकी भरणे क्रमप्राप्त आहे.-डी.एन.चावडा, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, कोपरगाव

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरीmahavitaranमहावितरण