शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

कोपरगाव भूमी अभिलेख कार्यालयाच्या छताला पहिल्याच पावसात गळती; वीस लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 2:30 PM

कोपरगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे.

रोहित टेके  । कोपरगाव : शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे शासनाने दुरुस्तीसाठी केलेला २० लाखांचा खर्च पाण्यात गेला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

    सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोपरगाव कार्यालयाच्यामार्फत या इमारतीचे संपूर्ण दुरुस्तीचे काम पाच महिन्यापूर्वी २० लाख खर्च करून कार्यालयासाठी कूपनलिका, फरशीचे पूर्ण काम, भिंतींची दुरुस्ती करून रंगकाम, छतावरील वॉटर प्रूफिंग, रेनवॉटर हार्वेस्टिंग यासह इतरही कामे करण्यात आली होती. मात्र शासनाने एवढा खर्च करूनही पाचच महिन्यात भिंतींना तडे गेले.

     यासंदर्भात ‘लोकमत’ने मागील महिन्यात २१ मे रोजीच्या अंकात वस्तुनिष्ठ बातमी प्रकाशित केली होती. त्यावेळी कोपरगाव येथील बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी इमारतीच्या दुरुस्तीचे काम गुणवत्तापूर्वक केले असून या इमारतीच्या मूळ पायातच दोष असल्याने इमारतीच्या भिंतींना तडे गेले असल्याचे सांगितले होते. मात्र गुणवत्तापूर्वक केलेल्या कामातून पहिल्याच पावसात छतातून पाण्याची गळती होत असल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तडे गेलेल्या भिंतींची तत्काळ दुरुस्ती करू असे सांगितले होते. तीही अद्यापपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. कार्यालय परिसरातील कूपनलिकेत विद्युत मोटरही बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याचाही विसर संबंधित विभागाला पडला आहे.  

 कार्यालय परिसरात  साचले पावसाचे पाणीविशेष म्हणजे कार्यालयाच्या बाहेरील परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहे. परंतु त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या गटारीचे ढापे खूप उंचीवर बसविण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात साचलेले पावसाचे पाणीही त्या गटारीतून वाहत नसल्याने या परिसरातच पाण्याचे मोठे तळे साचले होते.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावRainपाऊसGovernmentसरकार