शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
4
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
5
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
6
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
7
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
8
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
9
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
10
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
11
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
12
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
13
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
14
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
15
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
16
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
17
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
18
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
19
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले; डोक्यावर कर्जाचा भार तसाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 7:37 PM

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीसाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात राज्य सरकारने गुरूवारपर्यंत एकही रुपयाही जमा केला नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या या खात्यात अजून तरी खडखडाटच आहे.राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील ५६ शेतकरी जोडप्यांना पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, ...

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीसाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात राज्य सरकारने गुरूवारपर्यंत एकही रुपयाही जमा केला नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या या खात्यात अजून तरी खडखडाटच आहे.राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील ५६ शेतकरी जोडप्यांना पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, महापौर सुरेखा कदम यांच्याहस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्ह्यातील या शेतक-यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे देऊन आठ दिवस झाले आहेत. पण अजूनही कर्जमाफीस पात्र झालेल्या शेतक-यांच्या हिरव्या, पिवळ्या, लाल (ग्रीन, यलो, रेड लिस्ट) याद्याच कुठे झळकलेल्या नाहीत. एवढेच नाही तर पालकमंत्री व खासदारांनी जाहीरपणे हे शेतकरी कर्जमुक्त झाले असून हे प्रमाणपत्र दाखविताच तुम्हाला तुमच्या गावची सोसायटी लगेच रब्बी हंगामासाठी कर्ज देणार असल्याचे भाषण ठोकले होते. पण आता पालकमंत्री तसेच खासदार, आमदारांच्या हस्ते ज्या शेतक-यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली आहेत, त्या शेतक-यांची नावेच सरकारच्या कोणत्याही यादीत आलेली नाहीत. त्यामुळे या शेतक-यांसोबतच त्यांना दिलेल्या प्रमाणपत्रांचे भवितव्यदेखील धोक्यात आले आहे.जिल्हा सहकारी बँकेने गाव पातळीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतक-यांना कर्जवाटप केलेले आहे. यातील पात्र शेतक-यांचे खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक अशा सर्व माहितीसह याद्या तयार आहेत. कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या यातील शेतक-यांच्या प्रस्तावांची सहकार खात्याच्या लेखापरीक्षकांनी तपासणी देखील केलेली आहे. जिल्हा बँकेच्या पात्र कर्जदार शेतक-यांना कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यासाठी जिल्हा बँकेत स्वतंत्र खाते उघडण्यात आलेले आहे. पण शेतक-यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे देऊन आठ दिवस झाल्यानंतरही या खात्यात राज्य सरकारने कर्जमाफीचे पैसे वर्ग केले नाहीत. त्यामुळे या खात्यात खडखडाटच आहे. या खात्यातच खडखडाट असल्याने १८ आॅक्टोबरला मोठ्या दिमाखात व तेवढ्याच घाईघाईने आयोजित केलेल्या कर्जमुक्ती प्रारंभ सोहळ्यात कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या एकाही शेतक-याच्या बँकेतील कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे या बळीराजाची कर्जमाफी प्रत्यक्षात अवतरलेली नाही.

खात्यात पैसे नाहीतराज्य सरकारकडून जिल्हा बँकेस मिळणारी कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी बँकेत नव्याने स्वतंत्र खाते उघडण्यात आलेले आहे. पण त्यात पैसे जमा झालेले नाहीत.-रावसाहेब वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगर जिल्हा बँक.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळालंय. त्याला आठ दिवस झालेत. पण अजूनपर्यंत कर्ज खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाहीत. सरकारचा अजून मेळ बसना गेलाय. आठ दिवसात कुणाचा काही निरोप न्हायी. कर्ज खात्यात पैसे जमा झाले की सांगू, म्हणलेत साहेब.-दत्तात्रय शेळके, चौंडी सेवा संस्थेचे कर्जदार.

टॅग्स :AhmadnagarअहमदनगरFarmerशेतकरीGovernmentसरकारChief Ministerमुख्यमंत्री