शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

अटीतटीच्या लढतीच्या अंदाजामुळे पुनर्मतमोजणीची प्रशासनाला धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 3:59 PM

एकूण मतांपैकी १६ टक्के मतदान घेणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट वाचणार

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे २३ मे रोजी स्पष्ट होणार आहे. परंतु चौरंगी लढतीमुळे विजयी होणाऱ्या उमेदवाराला कमी मताधिक्य मिळाल्यास पुनर्मतमोजणीची मागणी होणार की काय, याची धास्ती प्रशासनाला पडली आहे. २० हजारांच्या पुढेच विजयी उमेदवाराचे मताधिक्य असेल, असा अंदाज बांधून प्रशासनातील अधिकारी स्वत:च्या मनाला दिलासा देऊ लागले आहेत. 

अटीतटीच्या लढाईमुळे विजयी उमेदवाराबाबत कुणालाही अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे प्रशासनाला पुनर्मतमोजणीची गरज पडेल की काय, अशी धास्ती वाटू लागली आहे. अशी वेळ आली तर प्रशासनाची तारांबळ उडणार आहे. कमी मानधनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन:मतमोजणीचा धाक आत्ताच पडला आहे. पुन:मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट असे संकेत नाहीत. दोन उमेदवारांमध्ये असलेल्या मतांमधील फरकाचा विचार करून निवडणूक निरीक्षक याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतात.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील २३ उमेदवारांसाठी मतदान झाले आहे. महायुतीचे उमेदवार खा.चंद्रकांत खैरे, काँग्रेस आघाडीचे आ. सुभाष झांबड, एमआयएम वंचित बहुजन आघाडीचे आ. इम्तियाज जलील व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत झाली आहे. उमेदवार आणि कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने विजयाचा दावा करणारी आकडेमोड करून सध्या निकालाची वाट पाहत आहेत. औरंगाबाद लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांत १८ लाख ८४ हजार ८६६ पैकी ११ लाख ९५ हजार २४२ (६३.४१ टक्के ) मतदान झाले आहे. 

 ...तरच डिपॉझिट वाचेलऔरंगाबाद लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांत १८ लाख ८४ हजार ८६६ पैकी ११ लाख ९५ हजार २४२ (६३.४१ टक्के ) मतदान झाले असून, एकूण मतांपैकी १६ टक्के मतदान घेणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट वाचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Aurangabadऔरंगाबादaurangabad-pcऔरंगाबाद