शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पाच तालुुक्यांत पावसाची हजेरी : आतापर्यत सरासरी ६६ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:20 AM

गणरायाच्या आगमनाबरोबर कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित होऊ लागल्या आहेत. बुधवारी सायंकाळी नगर शहरासह नेवासा, पारनेर, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यांत समाधानकारक पावसाने हजेरी लावली.

अहमदनगर : गणरायाच्या आगमनाबरोबर कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित होऊ लागल्या आहेत. बुधवारी सायंकाळी नगर शहरासह नेवासा, पारनेर, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यांत समाधानकारक पावसाने हजेरी लावली.पावसाळ्याचे सुरूवातीचे साडेतीन महिने कोरडे गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पुरेशा पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता असताना आता रबीसाठी तरी पाऊस पडावा, अशी प्रार्थना शेतकरी गणरायाकडे करत आहेत. तीन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. बुधवारी नेवासा तालुक्यातील सलाबतपूर (१७), कुकाणा (३), चांदा (२८), घोडेगाव (१९), बडाळा बहिरोबा (७४), सोनई (१६), नगर तालुक्यातील नगर (१४), केडगाव (२१), चास (२३), भिंगार (२८), वाळकी (३७), चिंचोडी पाटील (८), सावेडी (२८), पारनेर तालुक्यातील पारनेर (१७), सुपा (१२), निघोज (१५), वाडेगव्हाण (५२), श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा (२१), काष्टी (२१), बेलवंडी (३५), देवदैठण (२३), कोळगाव (२६), तर कर्जत तालुक्यातील कर्जत (१४), कोंभळी (१९), माही (१५), मिरजगाव (३१) वांबोरी (३०) आदी ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी व राहाता या तालुक्यांत मात्र बुधवारच्या पावसाने पाठ फिरवली.शेतक-यांचे परतीच्या पावसाकडे डोळे४जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ६६ टक्के पाऊस झाला असला तरी अकोले तालुका वगळता इतर तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. शेतक-यांच्या सर्व आशा आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत. उत्तरेतील मुळा, भंडारदरा, निळवंडे हे मोठे प्रकल्प वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणची धरणे, तलाव, बंधारे अद्याप कोरडेच आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस