शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

परीक्षा रद्द करण्याबाबत भाजपकडून राजकारण-प्राजक्त तनपुरे, लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:44 AM

पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी (दि.१४ जून) सांगितले.

 राहुरी : पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी कुठलेही राजकारण नाही. परंतु भाजप नेत्यांनी त्यात राजकारण आणले आहे. सद्यस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया चालू आहे. लवकरच विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी (दि.१४ जून) सांगितले.

  राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे मते जाणून घेतली आहेत. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अनेक विद्यार्थ्यांना नोकºया मिळतात. परीक्षेची टांगती तलवार राहिली  तर कोरोनात आरोग्यास व जीवितास धोका होऊ शकतो. परीक्षा पुढे ढकलली तर नोकरीची संधी जाईल. विद्यार्थी मानसिकता तणावाखाली राहतील. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व सर्व विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका झाल्या आहेत, असेही तनपुरे म्हणाले.  

   यूजीसीच्या मार्गदर्शन सूचनांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा जुलैमध्ये घेण्याचे ठरले आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जुलै महिन्याची परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री उदय सामंत, सर्व विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या समवेत अंतिम वर्षाच्या परीक्षेविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या चर्चेत विद्यार्थ्यांची बाजू सांगितली. त्यावर अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करून मागील सर्व सेमिस्टरचा सरासरी गुण द्यावेत. ज्या विद्यार्थ्यांना गुण वाढविण्यासाठी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी जुलैनंतर परीक्षा घ्यावी. याविषयी सर्वांचे एकमत झाले असल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

 विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव नको. एवढाच उद्देश आहे. त्यांच्यामागे कुठलेही राजकारण नाही, असेही तनपुरे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीEducationशिक्षणPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे