शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

पंचायत राज समिती : १५ दिवसांची तयारी आणि १२ तासांची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 4:44 PM

पंचायत राज समिती येणार म्हणुन नगर पंचायत समिती गेल्या १५ दिवसांपासून तयारी करत होती.

केडगाव : पंचायत राज समिती येणार म्हणुन नगर पंचायत समिती गेल्या १५ दिवसांपासून तयारी करत होती. सकाळी ७ वाजल्यापासून समितीची सुरू असलेली प्रतिक्षा तब्बल १२ तासांनी संपली. रात्री साडे नऊ वाजता एकदाची बैठक संपली आणि सर्वानींच सुटकेचा निश्वास टाकला. शालेय पोषण आहार, आरोग्य तपासणी, जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळेची गुणवत्ता तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचा तपशील या विषयाला धरुन पंचायत राज समितीने अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. समिती सदस्यांच्या प्रश्नांसमोर अधिका-यांची चांगलीच भंबेरी उडाली.नगर पंचायत समितीत पंचायत राज समितीने आधिका-यांची आढावा बैठक घेतली. शिक्षण विभागात शालेय तपासणी होते का? या तपासणी मध्ये कोण कोण असते? किती शाळांना भेटी दिल्या? याचा अहवाल सभापतींना कळवला का? प्राथमिक शाळांपेक्षा खाजगी शाळांचा दर्जा चांगला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेंच्या शिक्षकांना पन्नास हजार पगार आहे. खाजगी शाळेतील शिक्षकांना चार ते पाच हजार रुपये पगार आहे, तरी पण खाजगी शाळांचा दर्जा चांगला. जिल्हा परिषदेच्या शाळेतील सातवीच्या मुलांना रवी शब्द इंग्रजीतून लिहिता येत नाही ही शोकांतिका आहे. मार्च अखेर ४८ लाख रुपये लाभार्थ्यांचे शिल्लक कसे राहिले? आरोग्य अधिकारी यांना विचारले शालेय तपासणी केली त्याचे वेळापत्रक आहे का? या पथकात कोण असते? वर्षभरात किती तपासणी होतात. याची माहिती शिक्षण विभागाला दिली का? अशा प्रश्नांची सरबत्ती झाल्याने अधिकारी गांगरून गेले.दरम्यान आरोग्य विभागाला विचारले की कुपोषीत बालके किती, जन्म-मृत्यू दर किती? किती महिलांना भेटी दिल्या? उपकेंद्राना भेटी दिल्या का? अहवाल आहे का? आहार दिला जातो का? याची कधी चौकशी पाहणी केली? बाल विकास अधिकारी यांना विचारले की कमी वजनाचे बालक किती?पाणी पुरवठा विभागाला हिंगणगाव येथील सदोष मीटर बाबत जाब विचारला, लवकरात लवकर मीटर बदला जास्त बील आले त्याची शहनीशा करा, असा आदेश दिला. या सर्व कामांचा अहवाल गटविकास अधिका-यांनी आम्हास द्यावा, अशा सूचना समितीने केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद