शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:20 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरूच असून, बुधवारी दिवसभरात अमरधाम येथे ४२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरूच असून, बुधवारी दिवसभरात अमरधाम येथे ४२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. दररोज दोन हजाराहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी नगर शहरात दाखल होत आहेत. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातून गंभीर रुग्ण दाखल होत असून, दररोज ४० ते ४५ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागत आहे. वाढत्या मृत्यू संख्येमुळे उपाययोजना कमी पडत आहेत. मनपाच्या विद्युत दाहिनीमध्ये २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. उर्वरित मृतदेहांवर ओट्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. संंपूर्ण जिल्ह्यासाठी एकच स्मशानभूमी असल्याने तेथील यंत्रणेवरही ताण आला आहे.

.....

मनपाकडून आणखी शववाहिका

जिल्हा शासकीय रुग्णालयातून मृतदेह अमरधाम येथे आणण्यासाठी एकच शववाहिका होती. एका शववाहिकेत ५ ते ६ मृतदेह आणले जात आहेत. मृत्यू संख्या वाढल्याने मनपा आयुक्त शंकर गाेरे यांनी शववाहिका भाडेतत्वावर घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आरोग्य विभागाने आणखी एक शववाहिका उपलब्ध करून दिली आहे.