शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

स्थलांतरीत कामगारांचा आकडा चारशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 5:06 PM

लॉकडाऊनच्या काळातही पायी गावाकडे निघालेल्या स्थलांतरीत कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेच्या निवारागृहात शुक्रवारी (दि़ २४) नव्याने २४ जण दाखल झाले आहेत

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळातही पायी गावाकडे निघालेल्या स्थलांतरीत कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेच्या निवारागृहात शुक्रवारी (दि़ २४) नव्याने २४ जण दाखल झाले आहेत. त्यामुळे निवारागृहातील स्थलांतरीत कामगारांची संख्या ४१० झाली आहे़सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अनेक कामगार कामाच्या ठिकाणी अडकून पडले़ गेल्या महिनाभरापासून हे कामगार मिळेल ते खाऊन दिवस काढत आहेत़ मात्र काहीजणांचे कुटुंब गावाकडे असल्याने त्यांना गावाकडची चिंता आहे़ लॉकडाऊनच्या काळातही स्थलांतरीत कामगार वाहने मिळत नसल्याने पायी गावाकडे निघालेले आहेत़ जिल्हाबंदी असल्याने पोलीस स्थलांतरीत कामगारांना पकडून त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठवितात़ रुग्णालयातून त्यांना निवारागृहात पाठविले जाते़ शहर व परिसरातून जाणारे चारशेहून अधिक जणांना पकडून महापालिकेच्या निवारागृहात ठेवण्यात आले आहे़ तिथे त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली आहे़ दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ही संख्या अचानक वाढली़ त्यामुळे महापालिका प्रशासनाला येणाऱ्यांची व्यवस्था करताना चांगलीच कसरत करावी लागली़ महापालिकेने मंगल कार्यालये अधिग्रहीत केली असून, त्या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आली आहे़ मंगल कार्यालये कमी पडल्याने नव्याने बुरुडगाव येथील कार्यालय घेण्यात आला आहे़अन्नछत्रातून १७०० जणांना जेवणमहापालिकेने हातावर पोट असणा-यांसाठी दोन अन्नछत्र सुरू केले आहेत़ तिथेही मागणी वाढू लागली असून, शुक्रवारी दिवसभरात १ हजार ७०० नागरिकांना अन्नाची पाकिटे देण्यात आली आहेत़ याशिवाय सामाजिक संस्थांमार्फत अन्नाचे वाटप सुरू आहे़स्थलांतरीत कामगार येत आहेत़ त्यांची जेवनाची व राहण्याची सोय करण्यात आली आहे़ गुरुवारी नव्याने २४ जण दाखल झाले असून, ही संख्या आता चारशेहून अधिक झाली आहे़ गरज पडल्यास आणखी मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात येतील. -सुनील पवार, उपायुक्त, महापालिका 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका