शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

निळवंडेचे कालवे ओपनच : नितीन गडकरींचे लोकसभेत स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 3:41 PM

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अकोले तालुक्यातील निळवंडेचे कालवे हे बंदिस्त नसून ते पारंपरिक पद्धतीने जमिनीवरूनच होणार असल्याचे स्पष्ट केले.

शिर्डी : लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अकोले तालुक्यातील निळवंडेचे कालवे हे बंदिस्त नसून ते पारंपरिक पद्धतीने जमिनीवरूनच होणार असल्याचे स्पष्ट केले. या ठिकाणी जमीन संपादन झालेली आहे. त्यामुळे कालवे भूमीगत करण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले.निळवंडे धरणाचे काम सुरू होऊन ४७ वर्षे झाली आहे. प्रकल्पाची मूूळ किंमत ही फक्त साडेसात कोटी होती. त्यावरून ती आता २ हजार २३२ कोटी झाली आहे. तरी लाभक्षेत्राला पाणी नाही. कालवे पारंपरिक की भूमीगत याबाबत अकोले तालुक्यात संभ्रम निर्माण केला जात आहे. साईबाबा शताब्दी वर्षात दुष्काळी भागाला पाणी मिळणार का? तसेच निळवंडे लाभक्षेत्राला अच्छे दिन येणार का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर गडकरी म्हणाले, महाराष्ट्र शासनाने जमीन संपादित केलेली आहे. कालव्याच्या जागेचे उतारे हे शासनाच्या नावे आहेत. त्यामुळे कालवे पाईपलाईनने करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिथे भूसंपादन झाले आहे तिथे तात्काळ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जर साईबाबांच्या भूमीत पाणी गेले तर मलाही आशीर्वाद मिळतील, असे गडकरी यांनी सांगितले. बळीराजा कृषी संजीवनी योजनेत उर्ध्व प्रवरा-२ (निळवंडे) प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय जल आयोगाची मान्यता नुकतीच मिळाली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे वित्तीय गुंतवणूक प्रमाणपत्र मिळण्यास उशिर झाला असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले. राज्याचे पत्र मिळताच निळवंडेचा तात्काळ विशेष प्रकल्पात समावेश करून प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे गडकरी यांनी लोकसभेत सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSadashiv Lokhandeसदाशिव लोखंडेNitin Gadkariनितीन गडकरीlok sabhaलोकसभा