शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो; पावसाचा जोर वाढला        

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 6:16 PM

पावसाचा जोर वाढल्याने यंदाच्या हंगामात मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. मुळा धरणातून रविवारी दुपारी चार वाजता ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. पारनेरसह परिसरात पाऊस पडल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विसर्ग सोडण्याची वेळ पाटबंधारे खात्यावर आली आहे़. यंदाच्या पावसाळ्यात तीनदा मुळा धरण ओव्हरप्लो झाले आहे़. १५ आॅक्टोबरनंतर मुळा धरणाच्या मो-यातून पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे़.

राहुरी : पावसाचा जोर वाढल्याने यंदाच्या हंगामात मुळा धरण तिस-यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. मुळा धरणातून रविवारी दुपारी चार वाजता ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. पारनेरसह परिसरात पाऊस पडल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे विसर्ग सोडण्याची वेळ पाटबंधारे खात्यावर आली आहे़. यंदाच्या पावसाळ्यात तीनदा मुळा धरण ओव्हरप्लो झाले आहे़. १५ आॅक्टोबरनंतर मुळा धरणाच्या मो-यातून पाणी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे़.   गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे़. दुपारी मुळा धरणाच्या मो-यावरून पाणी पडू लागले़.  त्यामुळे मुळा धरणातून दुपारी दोन मो-यातून २०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले़. त्यानंतर ३ मो-यातून ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले़. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे़. कोतूळ येथे अद्याप पावसाची नोंद झालेली नाही़. कोतूळ येथे यंदा ९९६ मिमी, मुळानगर येथे ४७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ६२८० दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी सोडण्यात आले़. डाव्या कालव्यातून ७९२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे़. याशिवाय मुळा धरणातून जायकवाडीकडे ३ हजार ८९६ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आलेले आहे़.मुळा धरणाच्या तीन मो-यातून ३०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे़. यंदा पहिल्यांदाच १५ आॅगस्टपूर्वी मुळा धरण भरले होते़. मधल्या भागात पावसाने हजेरी लावल्याने मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे़. त्यामुळे नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे़. पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पाऊस सुरू आहे, असे मुळा धरणाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी सांगितले.बंधारे पूर्ण भरणारमुळा नदीपात्रात असलेले बंधारे पूर्ण क्षमतेने भरले नव्हते़. मुळा धरणातून नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़. मुळा धरणात सध्या २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे़. बंधारे भरणार असल्याने नदीकाठी असलेल्या शेतीसाठी आवर्तन लाभदायक ठरणार आहे.

टॅग्स :WaterपाणीAhmednagarअहमदनगर