शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
4
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
5
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
6
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
7
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
8
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
9
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
10
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
11
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
12
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
13
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
14
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
15
अन्वयार्थ: अभियांत्रिकीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी आणि पालकांचा संभ्रम
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

दीड महिन्यातच दूरगावचा तलाव कोरडाठाक; शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 12:02 PM

गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतीसाठी सोडण्यात आलेल्या कुकडीच्या आवर्तनातून कर्जत तालुक्यातील दुरगाव तलाव सुमारे ८० टक्के भरला होता. परंतु या तलावामधील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात नियमित उपसा होत असल्याने अवघ्या काही दिवसातच हा पाझर तलाव कोरडाठाक पडला आहे.

कुळधरण : गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतीसाठी सोडण्यात आलेल्या कुकडीच्या आवर्तनातून कर्जत तालुक्यातील दुरगाव तलाव सुमारे ८० टक्के भरला होता. परंतु या तलावामधील पाण्याचा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात नियमित उपसा होत असल्याने अवघ्या काही दिवसातच हा पाझर तलाव कोरडाठाक पडला आहे.

   सध्या दूरगावच्या तलावात पाण्याचा एक थेंब ही दिसत नाही. यावर अवलंबून असलेली शेती धोक्यात आली आहे. दुरगाव व कुळधरण परिसरातील एकूण तेराशे एकरावरील शेतीचे क्षेत्र या तलावामुळे ओलिताखाली येते. 

    पूर्वी या तलावावर ओलिताखालील खूप कमी क्षेत्र होते. यामुळे हा जलाशय आटत नव्हता. मात्र आता या तलावखालील ओलिताखाली क्षेत्र वाढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीसाठी उपसा होते. त्यामुळे यंदा हा तलाव कोरडाठाक पडला आहे. 

   ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तलाव कोरडा पडल्याने पिके सुकू लागली आहेत. कुकडीचे आवर्तन अजूनही सुटले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तरी कुकडीच्या आवर्तनातून दूरगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरुन द्यावा, अशी मागणी शेतक-यांतून होत आहे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणWaterपाणीKarjatकर्जत