शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
4
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
5
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
6
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
7
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
8
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
9
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
10
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
11
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
12
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
13
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
14
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
15
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
16
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
17
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
18
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
19
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
20
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पुन्हा उन्हाळी आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:33 AM

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून  मंगळवारी (दि.१२ मे) सकाळी सहा वाजता दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. २०० क्युसेकने पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे डाव्या कालव्याखालील अडीच हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

 राहुरी : मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून  मंगळवारी (दि.१२ मे) सकाळी सहा वाजता दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. २०० क्युसेकने पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे डाव्या कालव्याखालील अडीच हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मुळा धरणाचा डावा कालवा ८ मे रोजी बंद करण्यात आला होता. शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी मुळा डाव्या कालव्याखालील शेतकºयांनी मुळा पाटबंधारे खात्याकडे केली होती. त्यानुसार मंगळवारी पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे. आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे ऊस, कपाशी, चारा इत्यादी पिकांना दिलासा मिळणार आहे. मुळा डावा कालव्यातून पाणी सोडण्यासाठी शेतक-यांनी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार कार्यकारी अभियंता गणेश नाननोर, उपअभियंता योगेश जोर्वेकर, शाखा अभियंता विकास गायकवाड यांनी पाणी सोडण्याचे नियोजन केले. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या १२ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू आहे. फुटबॉल उघडा पडल्याने वांबोरी चारीचे पाणी मागच्या महिन्यातच बंद झाले आहे.वीस दिवस चालणार आवर्तन भागडा चारीचे आवर्तन सुरु असून त्याखाली असलेले पंचेचाळीस तलाव भरण्यात येणार आहेत. डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू झाल्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. मुळा डाव्या कालव्याचे आवर्तन वीस दिवस चालणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुळा पाटबंधारे खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणWaterपाणी