शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

कोयता हाच देव... उसाचे थळ हेच मंदिर; ऊस तोडणी मजुरांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 12:00 PM

लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही काम करतो, असेही त्यांनी सांगितले.

अनिल साठे । शेवगाव : गावाकडे सततचा दुष्काळ पाठीला पूजलेला, पाण्याअभावी रानं पडीक पडले आहेत, हाताला काम नाही. लेकरांचे भविष्य घडविण्यासाठी मुकादमाकडून उचल घेऊन वर्षातील सहा महिने कारखान्यावर ऊस तोडायला यावे लागते. अशी भावना ऊस तोडणी मजुरांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केली. कोयता हाच देव, उसाचे थळ हेच मंदिर अन् सपासप ऊस तोडणी करणे हीच पूजा या भावनेतून आम्ही काम करतो, असेही त्यांनी सांगितले.‘लोकमत’ प्रतिनिधीने गंगामाई (ता. शेवगाव) साखर कारखान्याच्या एका सात कोयत्याच्या टोळीत ऊस तोडणी मजुरांच्या सानिध्यात दोन दिवस राहुन त्यांचे काम अनुभवले. मजूर हे चिंचपूर (ता. पाथर्डी) येथील होते. त्यांच्यासोबत काम करून त्यांच्या व्यथा, अडचणी जाणून घेतल्या. वीज, पाणी, स्वच्छता गृह, किराणा, पंक्चर दुकान, हॉटेल, कटाई, पिठाची गिरणी आदी सुविधा कारखाना परिसरात होत्या. मात्र आरोग्य, प्राथमिक उपचार, जनावरांचा डॉक्टर, साखर शाळा आदी सुविधांचा अभाव दिसला. वाहनांची रहदारी असलेल्या रस्त्यावर पुरेशी वीज व्यवस्था होती. मात्र कामगारांच्या कोप्या भोवताली अंधारच होता.ऊस तोडणी मजुरांचा दिवस मध्य प्रहरी एकच्या सुमारास होतो. महिला उठून न्याहारीसाठी सायंकाळी केलेली भाकरी, भाजी कापडी फडक्यात बांधून घेतात. सोबत पिण्यासाठी पाणी दुधाच्या कॅनमधे घेतले जाते  अन् सुरू होतो उसाच्या फडाकडे प्रवास. मुकादम विष्णू दशरथ बडे यांच्यासह टोळीतील त्यांचे सहकारी बुवासाहेब बडे, अशोक त्रिंबक बडे, गणेश आजीनाथ बडे, संजय होडशीळ, शाहीराम महादेव बडे, मारुती अर्जुन कावळे हे पत्नीसह कारखान्यापासून रात्री १ वाजून ३६ मिनिटांनी घोटण, खुंटेफळमार्गे दादेगावकडे बैलगाड्यांचा ताफा घेऊन निघाले. पहाटे ४ वाजता उसाच्या फडावर पोहोचले. तेथे बैलांना वाढे टाकून सर्वांनी कोयत्याने सापसप ऊस तोडायला सुरवात केली. प्रत्येक जोडप्याने सºया वाटून घेतल्या होत्या. सकाळी सूर्य उगवल्यावर सातच्या सुमारास ऊस तोडायचे थांबवले. महिलांनी उसापासून वेगळे केलेले वाढे गोळा करत पेंढ्या बांधण्यास सुरवात केली. पुरुषांनी ऊस बांधत बैल गाडीत टाकण्यास सुरवात केली. मध्ये पाच मिनिटाचा ब्रेक घेत सोबत आणलेले बिस्किट पाण्याबरोबर खाल्ले व पुन्हा काम सुरू केले. पुरुष मंडळींइतकीच मेहनत महिलाही घेत होत्या.दहाच्या सुमारास गाडीत भरलेला ऊस दोरीच्या सहाय्याने बांधत बैलांना जुंपले. पुन्हा कारखान्याकडे परतीचा प्रवास सुरू झाला. प्रवासात न्याहारी करत दुपारी साडेबाराच्या सुमारास कारखान्याच्या वजन काट्यावर गाड्या पोहोचल्या. जवळपास सगळ्यांनी दोन टन ऊस गव्हाणीत टाकला होता. ९०० ते १००० रूपयांची कमाई झाली होती. ती कमाई दोघांची नव्हती तर चौघांची होती. दोन टनापेक्षा जास्त ओझे बैलांच्या मानगुटीवर होते. त्यांचीही मेहनत त्यात होती. बारा तासात प्रत्येकाने २०० ते २५० रूपये कमावले होते. कोपीमध्ये परतल्यावर बैलाच्या पाठीवर थाप टाकून प्रत्येकाने त्यांना पेंड खायला दिली.बैलगाडीचे कार्यक्षेत्र १७ किलोमीटरचे...कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील १७ किमीपर्यंतच ऊस टायर बैल गाडीला आणता येतो. ऊस तोडणे आणि भरणे यासाठी १२ किलोमीटरला प्रतिटन ४४०.४ रूपये मिळतात. वाढीव प्रत्येक किलोमीटर मागे १२ रूपये जास्त मिळतात. ट्रॅक्टर, जिटी, ट्रक वरील टोळ्यांना वेगळा दर मिळतो. ऊस तोडणे व भरणे यासाठी ट्रॅक्टर टोळीला प्रतिटन २६७ रूपये मिळतात. ऊस खाली करण्यासाठी प्रत्येकाच्या वेगळ्या रांगा व नंबर दिला जातो.कोणत्याच योजनेबद्दल माहिती नाहीऊस तोडणी मजुरांच्या योजनांबद्दल किंचितही कल्पना त्यांना नव्हती. केवळ ऊस तोडायचा, किती वजन भरले अन् किती रूपये मिळाले इतकेच त्यांच्या रोजच्या जगण्यातील गणित आहे. कष्ट करतांना मोलाची साथ देणाºया बैलाच्या जोडीची प्रचंड काळजी त्यांच्यात दिसली.घेतलेली उचल फे डायची कशी?बहुतांश मजूर जोडप्यांनी मुलांना घरी आई, वडिलांच्या जवळ ठेवलेले होते. काहींनी वसतिगृहामध्ये ठेवले होते. उसाच्या कमतरतेमुळे गळीत हंगाम यंदा लवकर उरकणार याची चिंता सतावत होती. मुकादमाकडून घेतलेली उचल फेडायची तरी कशी अन् पट्टा पडल्यावर घरी जाऊन करायचे तरी काय? महिनाभरानंतर दुसरे काम शोधावे लागणार या काळजीत मजूर दिसत होते. लोकमत प्रतिनिधी २७ तास उसाच्या थळात‘लोकमत’ प्रतिनिधी अनिल साठे हे गंगामाई (ता. शेवगाव) साखर कारखान्याच्या एका सात कोयत्याच्या टोळीत ऊस तोडणी मजुरांच्या सानिध्यात तब्बल २७ तास राहिले. त्यांच्यासोबत राहुन मजुरांचे काम अनुभवले. चिंचपूर (ता. पाथर्डी) येथील मजूर त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासोबत काम करून, त्यांच्यासोबत भाजी-भाकरी खात त्यांच्या व्यथा, अडचणी जाणून घेतल्या. अंधार, रात्रीची थंडी मजुरांसोबत अनुभवत त्यांचे जीवन किती खडतर आहे, प्रत्यक्ष अनुभवले. त्यांच्या या आपुलकीचे मजुरांनीही कौतुक केले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेShevgaonशेवगावLabourकामगार