शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जिल्हा विभाजनासाठी समितीची स्थापना

By admin | Published: June 29, 2014 11:22 PM

श्रीरामपूर : राज्यातील अहमदनगर, बीड, नाशिकसह राज्यातील इतरही जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्हा निर्मितीची मागणी राज्यातील लोकप्रतिनिधींकडून होत आहे.

श्रीरामपूर : राज्यातील अहमदनगर, बीड, नाशिकसह राज्यातील इतरही जिल्ह्याचे विभाजन करून नव्या जिल्हा निर्मितीची मागणी राज्यातील लोकप्रतिनिधींकडून होत आहे. याची दखल घेऊन राज्य सरकारने जिल्हा विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी पुनर्रचना समितीची स्थापना केली आहे. ही समिती दोन महिन्यात सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे सरकारी आदेशात म्हटले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विभागाच्या अतिरक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुनर्रचना समिती नेमली आहे. या समितीमध्ये नियोजन विभाग, वित्त विभाग व ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांसह राज्यातील नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर, कोकण, नांदेड अशा राज्यातील सर्व महसूल विभागांच्या आयुक्तांचा समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर महसूल खात्याचे उपसचिव समितीचे सदस्य सचिव म्हणून काम करणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णय कोणत्या निकषांवर घेण्यात आला? अहमदनगरसह इतरही मोठ्या जिल्ह्यामधून विभाजनाची मागणी होत असताना त्यांचे विभाजन का केले जात नाही? असा प्रश्न अनेक मंत्र्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांना ठाणे जिल्हा विभाजनाबाबत सरकारने विचारात घेतलेल्या निकषांची माहिती देण्यात आली. जिल्हा विभाजन करणे ही अत्यंत क्लिष्ट व खर्चिक बाब असल्याने राज्यातील अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांचे विभाजन करण्यासाठी राज्यस्तरावर कोणकोणते निकष विचारात घ्यावेत, याबाबत अभ्यास करुन सरकारला शिफारस करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील जिल्हा विभाजनाचे निकष निश्चित करण्यासाठी जिल्हा पुनर्रचना समिती गठीत करण्यात आली, असे आदेशात म्हटले आहे. २४ जून २०१४ रोजी महसूल व वन विभागाने शासन निर्णय क्रमांक प्राफेब २०१४/प्र. क्र. ८७/ठाणे/म-१० नुसार ही समिती गठीत केल्याचा आदेश काढण्यात आला आहे. (प्रतिनिधी)या समितीने जिल्ह्याचे विभाजन करताना विचारात घ्यावयाच्या निकषांबाबत आपल्या शिफारशी सरकारला सादर करायच्या आहेत. या शिफारशी सादर करण्यासाठी समितीला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. -सोनलस्मित पाटील, अवर सचिव, महसूल विभाग