शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

शिक्षणतज्ज्ञ सर्जेराव निमसे म्हणतात...परीक्षा न झाल्यास महाराष्ट्राची नाचक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 11:24 AM

अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता पदवी देणे अशैक्षणिक असून विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. देशाच्या इतर भागात परीक्षा होत असताना महाराष्ट्रात त्या न होणे ही राज्याची नाचक्की ठरेल. या प्रकारामुळे आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर हिणवले जाईल. त्यामुळे वेळ जरी लागला तरी परीक्षा घेऊनच पदवी दिली गेली पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले.

अहमदनगर : अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता पदवी देणे अशैक्षणिक असून विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. देशाच्या इतर भागात परीक्षा होत असताना महाराष्ट्रात त्या न होणे ही राज्याची नाचक्की ठरेल. या प्रकारामुळे आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर हिणवले जाईल. त्यामुळे वेळ जरी लागला तरी परीक्षा घेऊनच पदवी दिली गेली पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवर अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. त्यावर डॉ. निमसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. कोणत्याही शाखेच्या अंतिम परीक्षांना वेगळे महत्व असते. सध्या विद्यापीठ पातळीवर परीक्षांची सर्व तयारी झालेली आहे. विद्यापीठांनी त्यावर खर्चही केलेला आहे. विद्यार्थी तयार आहेत, पालकांची हरकत नाही, मग शासन परीक्षांना नकारघंटा का देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी ही घेतलीच पाहिजे. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. 

परीक्षा न घेता दिलेली ‘उसणी’ पदवी घेऊन आपला विद्यार्थी जगाच्या पाठीवर कोणत्या तोंडाने मिरवणार? राष्ट्रीय पातळीवर तो इतर ठिकाणी पुढील शिक्षण घेण्यासाठी गेला तर त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्याचे मनोबल खचेल. शिवाय करिअरच्या दृष्टीनेही त्याला याचा फटका बसणार आहे. 

केवळ अंतिम सत्राचीच परीक्षा घ्यायची असल्याने तसेही विद्यार्थी कमीच आहेत. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार आहे. महाविद्यालयांकडे स्टाफ मुबलक आहे. विद्यार्थी व पालकांची तयारी आहे. त्यामुळे शासनाने परीक्षा घेणेच संयुक्तिक ठरेल, असे मत डॉ. निमसे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPune universityपुणे विद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थी