शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

श्रीरामपूर पालिका विषय समित्यांचा वाद न्यायालयात; सत्ताधारी व विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 2:17 PM

नगरपालिकेत विषय समित्या गठित करण्याचा विषय औरंगाबात उच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. यासंदर्भात भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांचे समर्थक असलेल्या नगरसेवक बाळासाहेब गांगड व संतोष कांबळे यांनी याचिका दाखल केली आहे.

श्रीरामपूर : नगरपालिकेत विषय समित्या गठित करण्याचा विषय औरंगाबात उच्च न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. यासंदर्भात भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांचे समर्थक असलेल्या नगरसेवक बाळासाहेब गांगड व संतोष कांबळे यांनी याचिका दाखल केली आहे. एकाच वेळी सत्ताधारी व विरोधी या दोन्ही गटांना शह देण्याची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून पालिकेत विषय समित्यांच्या निवडी रखडलेल्या आहेत. त्याला तांत्रिक कारण आहे. सत्ताधारी शहर विकास महाआघाडी व विरोधी काँग्रेस या दोन्ही गटांकडे गटनेता नाही. दोन्ही गटांचे वाद न्यायालयात प्रलंबित आहेत. शहर विकास महाआघाडीकडून भाजपच्या भारती कांबळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार तर काँग्रेसकडून संजय फंड व अंजूम शेख यांच्यात गटनेतेपदाचा वाद आहे. जिल्हाधिकाºयांनी तीन वेळा विषय समित्यांच्या निवडीकरिता कार्यक्रम घेऊन कुठलाही निर्णय होऊ शकला नव्हता. प्रांताधिकारी अनिल पवार यांनी बोलविली. बैैठक याच तांत्रिक अडचणीमुळे तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी विषय समित्या निवडीसाठी बैैठक बोलवत पुन्हा ती रद्द करत असल्याचे पत्र जारी केले होते. पालिकेत पूर्वी नगराध्यक्षा अनुराधा आदिक तसेच उपनगराध्यक्ष करण ससाणे या गटांमध्ये नगरसेवकांचे विभाजन होते. आता मात्र भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी पालिकेच्या राजकारणात थेट लक्ष घातले आहे. त्यामुळे ३५ नगरसेवकांमधील अनेकजण विखे यांच्या सोबत गेले आहेत. यात नगराध्यक्षा आदिक व ससाणे यांना पूर्वी मानणा-या नगरसेवकांचाही समावेश आहे. विषय समित्या गठित करण्यासाठी न्यायालयात धाव घेणारे याचिकाकर्ते बाळासाहेब गांगड व संतोष कांबळे हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. नगराध्यक्षा आदिक व भाजप नेते राधाकृष्ण विखे या दोघांचे ते समर्थक आहेत. विषय समित्या स्थापन करण्यात सत्ताधारी व विरोधी दोन्ही गट रस दाखवत नव्हते. या पार्श्वभूमीवर दोघा नगरसेवकांनी याचिका दाखल करून सर्वांनाच धक्का दिल्याचे मानले जात आहे. 

पालिकेचे सर्व कामकाज एकाच व्यक्तीला पाहणे शक्य नाही. विषय समित्यांची तयार झाल्यास जबाबदारीची विभागणी होते. कामकाजात सुसूत्रता येते. आमचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसचे नगरसेवक संतोष कांबळे यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरPoliticsराजकारण