केंद्र सरकारने साकळाई योजना पूर्ण करावी : खा.सुजय विखे यांची लोकसभेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:17 PM2021-03-20T16:17:53+5:302021-03-20T16:22:54+5:30

अहमदनगर  : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३२ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी नाबार्ड अंतर्गत पाचशे कोटी रुपयांचा निधी देऊन योजना तातडीने पूर्ण करावी. ...

Central Government should complete Saklai Irrigation Scheme: Min. Demand of Sujay Vikhe in Lok Sabha | केंद्र सरकारने साकळाई योजना पूर्ण करावी : खा.सुजय विखे यांची लोकसभेत मागणी

केंद्र सरकारने साकळाई योजना पूर्ण करावी : खा.सुजय विखे यांची लोकसभेत मागणी

Next

अहमदनगर : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३२ गावांसाठी वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी नाबार्ड अंतर्गत पाचशे कोटी रुपयांचा निधी देऊन योजना तातडीने पूर्ण करावी. केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालयामार्फत ही योजना पूर्णत्वास न्यावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आज लोकसभेत केली.

विखे म्हणाले, नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांसाठी साकळाई जलसिंचन उपसा योजना महत्त्वपूर्ण आहे. तरीही योजना अद्यापही कार्यान्वित होऊ शकली नाही. गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून शेतकरी योजनेसाठी संघर्ष करीत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद देखील केली होती.

त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले. या योजनेकडे आघाडी सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही. लोक हितासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेली ही योजना निधीअभावी व राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे अडकू नये, त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे  यांनी यापूर्वी नाबार्डच्या अर्थसहाय्यातून वांबोरी चारी उभी केली होती. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असून देखील पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सोय झाली आहे. याच योजनेच्या धर्तीवर साकळाई जलसिंचन उपसा योजनेला केंद्र सरकारच्या मार्फत नाबाड अंतर्गत जर अर्थसाहाय्य मिळाले तर ३२ गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल. 

Web Title: Central Government should complete Saklai Irrigation Scheme: Min. Demand of Sujay Vikhe in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.