प्रलबिंत पिक विम्यासाठी ब्राम्हणीच्या शेतक-यांची उच्च न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 03:21 PM2018-10-19T15:21:19+5:302018-10-19T15:22:08+5:30

दोन वर्षापुर्वी विविध पिकांचा विमा हप्ता भरला असताना बाजरी वगळता कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांची विम्यापोटी रक्कम मिळाली नसल्यामुळे ब्र्राम्हणी परीसरातील शेतक-यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली आहे

 Bramhani's farmers have passed the High Court for the release of illuminated crop insurance | प्रलबिंत पिक विम्यासाठी ब्राम्हणीच्या शेतक-यांची उच्च न्यायालयात धाव

प्रलबिंत पिक विम्यासाठी ब्राम्हणीच्या शेतक-यांची उच्च न्यायालयात धाव

Next

ब्राम्हणी : दोन वर्षापुर्वी विविध पिकांचा विमा हप्ता भरला असताना बाजरी वगळता कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांची विम्यापोटी रक्कम मिळाली नसल्यामुळे ब्र्राम्हणी परीसरातील शेतक-यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली आहे. संबधित कंपनी, केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
२०१६ मध्ये शेतक-यांनी विमा हप्ता भरला होता. दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कांदा, सोयाबीन व अन्य पिकांची नासाडी झाली. प्राध्यान्य बाजरीच्या विम्याला देण्यात येवून भरपाई देण्यात आली. यामुळे संतप्त शेतक-यांनी वेळोवेळी संबधित विमा कंपनी, कृषी विभाग व वरिष्ठ अधिका-यांची भेट घेवून विमा रक्कम मिळण्याची मागणी केली. सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आश्वासन देवून अधिका-यांनी मागणीकडे कानाडोळा केला. यामुळे शेतक-यांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली. डॉ.राजेंद्र बानकर, सचिन ठुबे, उमाकांत हापसे, सतिषराव तारडे, शिवकांत राजदेव आदीसह ६८ शेतकारी न्यायालयात गेले. परीसरात सुमारे पाचशे शेतकरी अद्याप वंचित आहे.

Web Title:  Bramhani's farmers have passed the High Court for the release of illuminated crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.