शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
3
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
4
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
5
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
6
अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान? 
7
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
8
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
9
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
10
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
11
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
12
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
13
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
14
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
15
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
16
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
17
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
18
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
19
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
20
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...

दिवाळीपर्यंत झगमगाट

By admin | Published: September 23, 2014 10:52 PM

अहमदनगर : सणासुदीच्या दिवसांनाच जोडून आलेला विधानसभा निवडणुकांचा कालावधी यामुळे भारनियमनातून काही दिवस तरी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

अहमदनगर : गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या दिवसांनाच जोडून आलेला विधानसभा निवडणुकांचा कालावधी यामुळे भारनियमनातून काही दिवस तरी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. वीज भारनियमनाबाबत ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातील ग्राहकांची मोठी नाराजी असते. थकबाकी व नेहमीच्या वीजचोरीमुळे गटनिहाय भारनियमन महावितरणने लागू केले होते. त्यामुळे तीन ते तब्बल आठ तासांपर्यंत वीजकपातीचा सामना ग्राहकांना करावा लागला. त्यातच पाण्याअभावी राज्यातील मोठे वीजनिर्मिती केंद्र बंद पडल्याने झालेली तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या भारनियमनाचीही भर पडली. याव्यतिरिक्त स्थानिक उपकेंद्र, रोहित्रांतील बिघाड वेगळाच. या सर्वांचा परिणाम म्हणून जूनअखेरपर्यंत भारनियमनाचा चांगलाच चटका ग्राहकांना बसला. परंतु जुलैमध्ये पंढरपूर यात्रा व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महावितरणने २० ते २५ दिवस भारनियमन रद्द केले. त्यानंतर मात्र पाऊस नसल्याने आणखी वीज तूट निर्माण झाली व १०-१५ दिवस विजेचा लपंडाव सुरू झाला. नंतर मात्र आॅगस्टमध्ये आलेला गणेशोत्सव, दरम्यान पावसाची दमदार हजेरी यामुळे अखंडित वीज मिळू लागली. त्यातच सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. आता नवरात्रौत्सवात दहा दिवस भारनियमन रद्दचे आदेश महावितरणने काढले आहेत. आॅक्टोबरमध्ये दसरा व दिवाळी असे सणासुदीचे दिवस असल्याने भारनियमन रद्द होणारच आहे. त्यामुळे ए पासून एफपर्यंतच्या गटातील ग्राहकांनाही अजून महिनाभर तरी २४ तास वीजपुरवठा होईल, अशी शक्यता आहे. (प्रतिनिधी)