शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

अहमदनगर महापालिकेतही भाजपाचा स्वबळाचा नारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 5:48 PM

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने २०१८ मध्ये होणाºया अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे.

ठळक मुद्दे२०१८ मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीचे भाजपाने फुंकले रणशिंगभाजपा कार्यालयात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णयमिरा-भाईंदरमध्ये यशाबद्दल फटाके वाजवून आनंदा साजरा

अहमदनगर : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविल्याने २०१८ मध्ये होणाºया अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. आज दुपारी गांधी मैदानातील भाजपा कार्यालयात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस शहर जिल्हा सरचिटणीस किशोर बोरा यांनीआगामी महानगरपालिका स्वबळावर लढून महापौर भाजपाचा करण्याचा ठराव मांडला. त्यास उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी अनुमोदन दिले तर उपस्थित असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने हा ठराव संमत केला. यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, उपाध्यक्ष अन्वर खान, नगरसेविका मालन ढोणे, गटनेते सुवेंद्र गांधी, मध्यनगर सरचिटणीस प्रशांत मुथा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.मिरा-भाईंदरमध्ये भाजपाने मिळविलेल्या यशाबद्दल फटाके वाजवून आनंदा साजरा करण्यात आला. यावेळी सुनिल रामदासी म्हणाले, विकासाच्या मुद्यावर भाजपा निवडणुका लढवत असून, उत्कृष्ट नियोजनामुळे जिंकत आहे. भाजपा संपूर्ण राज्यात मिळवत असलेल्या यशामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे.उपमहापौर छिंदम म्हणाले, २५ वर्षे शिवसेनेचा आमदार नगरमध्ये होता. तसेच गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे. महापालिकेतही या आधी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांना महापौरपद मिळाले. मात्र आजपर्यंत भाजप यापासून लांब आहे. आता मात्र भाजपला नगर शहरामधील सर्व निवडणुका जिंकण्याची मोठी संधी आहे.  यासाठी २०१८ ला नगरच्या महापालिकेला सामोरे जायचे आहे. ही निवडणुक आपण स्वबळावर लढणार असून त्यासाठी नियोजन करत आहोत.  सुवेंद्र गांधी म्हणाले, भाजपाच्या सरकारमुळे अच्छे दिन आले आहेत. जनता उत्स्फुर्तपणे भाजपाच्या मागे उभी आहे. नगरमध्येही  शहर भारतीय जनता पार्टी चांगले काम करत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्तविक अन्वर खान यांनी तर आभार नरेश चव्हाण यांनी मानले.  यावेळी विश्वनाथ पोंदे, मल्हार गंधे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भोरे, सुभाष साळवे, अज्जू शेख, संतोष शिरसाठ, अविनाश साखला, रफिक सय्यद, सागर कराळे, उमेश साठे, सागर गोरे, तुषार पोटे, नितीन घोरपडे, संदिप पवार, सुनिल सकट, जालिदर शिंदे, शुभम कोटा, शशिकांत पालवे, विपुल पुप्पाल, हेमंत दंडवते, शिवाजी दहिंडे, गणेश साठे उपस्थित होते