शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

भाजप सरकारने दूध उत्पादकांना फसवले : राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 4:54 PM

राज्य सरकारवर अवलंबून राहून शेतकरी सुखी होणार नाहीत. भाजप सरकारचे मंत्री फक्त घोषणा करतात आणि मग विचार करतात.

संगमनेर : राज्य सरकारवर अवलंबून राहून शेतकरी सुखी होणार नाहीत. भाजप सरकारचे मंत्री फक्त घोषणा करतात आणि मग विचार करतात. कोणत्याच निर्णयाची अंमलबजावणी या सरकारकडून होत नाही. कर्जमाफी योजनेप्रमाणेच राज्यातील दुध उत्पादकांनाही या सरकारने फसवले आहे. दूध उत्पादकांना पाच रूपयांचा दर वाढवून देण्यातही सरकारने खोटेपणा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.शनिवारी तालुक्यातील मनोली येथे एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विखे यांनी सरकारवर टीका केली. अमुल दुध संघाचे सह व्यवस्थापक प्रभाकर चौरे, डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, जिल्हा परिषद सदस्या अ‍ॅड. रोहीणी निघुते, पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, भगवानराव इलग, रामभाऊ भुसाळ, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी आधिकारी कारभारी नवले, पंचायत समितीचे गटविकास आधिकारी सुरेश शिंदे, सरपंच उज्वला शिंदे, विनय निसाळ, मच्छिंद्र भागवत, अण्णासाहेब बेंद्रे आदी उपस्थित होते.विखे म्हणाले, राज्य सरकारने दुध उत्पादकांना दर वाढवून द्यावेत या मागणीसाठी नागपुर आधिवेशनात आपण मागणी लावून धरली होती. सरकारने केवळ घोषणा केली. पण आज तागायत दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतेही पैसे वर्ग केले नाहीत. शेतकरी कर्जमाफी योजनेतही हाच प्रकार सरकारने केला. मुख्यमंत्र्यांपासुन सर्व मंत्री आधी घोषणा करतात आणि मग त्याचा विचार करतात. असे अनेक फतवे मंत्र्यांनी मागे घेतल्याची उदाहरणे असल्याचे विखे म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर