शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भीमा कोरेगाव प्रकरण : शाळा सुटली, पण दोन दिवसांपासून चिमुकली घरीच नाही परतली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 3:44 PM

खरंतर कालच्या घटनेमुळे मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आलं होतं. त्यानुसार स्कूल बसने दुपारी दोन वाजता

अहमदनगर - भीमा-कोरेगाव घटनेचे मुंबईसह राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी तीव्र स्वरुपात आंदोलन सुरू असून यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झाले आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मंगळवारी शाळा लवकर सोडण्यात आल्या. पण श्रीरामपूरमधल्या शाळेतील आठ वर्षाची चिमुकली मुलगी कालपासून घरीच परतली नाही. तणाव असल्यामुळं काल शाळा लवकर सोडण्यात आली मात्र ती शाळेतून घरी न येता 2:45 वाजल्यापासून हरवली आहे.  श्रीरामपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खरंतर कालच्या घटनेमुळे मॉडेल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आलं होतं. त्यानुसार स्कूल बसने दुपारी दोन वाजता खानापूर इथे तिला सोडलं. पण 24 तास उलटूनही मुलगी घरी पोहोचलीच नाही, कुटुंबीय चिंतेत आहेत.  दरम्यान, तणावाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने तिचं अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर येथे मॉडेल इंग्लिश स्कुल येथे शिकणारी चिमुकली शाळेच्या बसने खानापूर येथे नेहमीच्या थांब्यावर उतरली. तिचे घर गावापासून एक किमी अंतरावर होते. एका अज्ञात व्यक्तीने दुचाकीवरुन तिला पळवून नेल्याची तक्रार मुलीचे वडील अमोल बाबासाहेब आदिक यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, पनवेल येथे मुलीचा शोध लागल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्याबाबत अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव