शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

अफवा पसरवाल तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 5:39 PM

लहान मुलांसह महिलांना पळविणारे व दरोडा टाकणाऱ्या टोळ्या गावोगावी फिरत असल्याच्या अफवांमुळे शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण कायम आहे.

अहमदनगर : लहान मुलांसह महिलांना पळविणारे व दरोडा टाकणाऱ्या टोळ्या गावोगावी फिरत असल्याच्या अफवांमुळे शहरासह ग्रामीण भागात भीतीचे वातावरण कायम आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अफवा पसरविणारे व संशय घेऊन कुणाला मारहाण करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पोलीस प्रशासन म्हणाले आहे, की गावामध्ये मुले पळविणा-या व दरोडा टाकणा-या टोळ्या आल्या आहेत, अशा स्वरूपाच्या अफवा सोशल मीडिया व इतर प्रकारे पसरवून जनतेमध्ये घबराट व भीतीचे वातावरण पसरविण्यात येत आहे. अशा स्वरूपाच्या अफवांमुळे गावात व वस्तीवर येणारे अपरिचित लोक, साधूवेशातील लोक, किरकोळ विक्री करणारे फेरीवाले यांना विनाकरण मारहाण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा स्वरूपाच्या मारहाणीतून कोणी व्यक्ती जखमी व अथवा मृत्युमुखी पडली तर सोशल मीडियावर इतर प्रकारे अफवा पसरविणा-या इसमांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.अशा स्वरूपाच्या अफवांमुळे औरंगाबाद येथे खुनाची घटना घडली असून, या प्रकरणी ५ ते ६ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा स्वरूपाच्या घटना नंदुरबार व मध्य प्रदेश येथेही घडल्या आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरवू नयेत व कोणी अशा अफवा पसरवित असेल तर तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.सोशल मीडियातूनच अफवेचा उगममुले पळविणारी टोळी आल्याची अफवा प्रथम दोन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश व नंदुरबार भागात प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून आली. परराज्यातील संग्रहित व्हिडिओ प्रसारित करून त्याखाली दंतकथा सुरू झाल्या. ही अफवा औरंगाबाद, लातूर, बीड ते नगर जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. सोशल मीडियासह या अफवेची माऊथ पब्लिसिटीही मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ त्यावर सहज विश्वास ठेवत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेत अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस