------------
दुकाने सुरू करण्याची सेनेची मागणी
अहमदनगर : नगर शहरातील किराणा दुकाने, भाजी, फळे विकण्यास बंदी घातल्याने सर्वसामान्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. लॉकडाऊनचा आर्थिक फटका त्यात महागाई यामुळे जगणे कठीण झाले असून, शहरातील किराणा दुकाने, भाजी, फळे सकाळी ७ ते ११ सुरू करावीत, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी केली. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, दत्ता जाधव, विशाल वालकर उपस्थित होते.
......
विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा विस्क्ळीत
अहमदनगर : वादळी वाऱ्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी योजनेवरील विद्युत पुरवठा सोमवारी दुपारी १२ वाजेनंतर खंडित झाला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या सोसाट्याचा वारा वाहत असल्याने विद्युत पुरवठा खंडित होत असून, त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे उपनगरांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे.
...