शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही; माजी सरपंच बरळला... घाबरून पळाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:58 PM

आपल्या भारत देशाबाबत श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या माजी सरपंचाने अक्षरशः अकलेचे तारे तोडले आहेत. ''भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही'',असे वादग्रस्त विधान विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यदने केले आहे.

ठळक मुद्देभारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही, विसापूरच्या माजी सरपंचाचे विधान माजी सरपंच जब्बार सय्यदच्या अटकेची मागणीसाठी गावकरी आक्रमक

अहमदनगर - आपल्या भारत देशाबाबत श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या माजी सरपंचाने अक्षरशः अकलेचे तारे तोडले आहेत. ''भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही'',असे वादग्रस्त विधान विसापूरचा माजी सरपंच जब्बार सय्यदने केले आहे. सय्यदच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे गावामध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सय्यदला तात्काळ अटक करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी गाव बंद केला आहे. 

सोमवारी (18 फेब्रुवारी) संध्याकाळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. याच सभेमध्ये बोलताना जब्बार सय्यदने म्हटले की, 'भारत पाकिस्तानचं काही बिघडवू शकत नाही'. जब्बार सय्यदच्या वादग्रस्त विधानाचा गावकऱ्यांकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. जब्बार सय्यदच्या अटकेच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलन छेडले आहे. सर्व व्यापा-यांनी तातडीने आपले व्यवसाय बंद केले आहेत.

बेलवंडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांनी गावाला भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, घटनेनंतर माजी सरपंच जब्बार सय्यद फरार झाला आहे. मात्र त्याला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन पडवळ यांनी दिली आहे. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर