शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

अपहरण, रेप, पोलिसांवर गोळीबार: ये अहमदनगर है़, या लूटमारनगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:40 PM

तरुणीवर अत्याचार, थेट पोलिसांवर गोळीबार अन् भरचौकासह महामार्गावरील लूटमाऱ़़ गेल्या आठ दिवसांतील या चार ते पाच घटनांचे अवलोकन केले तर जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढून थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे़.

अरुण वाघमोडे /  अहमदनगर : गजबजलेल्या चौकातून उद्योजकाचे अपहरण, रस्त्याच्या कडेला वाहनात तरुणीवर अत्याचार, थेट पोलिसांवर गोळीबार अन् भरचौकासह महामार्गावरील लूटमाऱ़़ गेल्या आठ दिवसांतील या चार ते पाच घटनांचे अवलोकन केले तर जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोके वर काढून थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे़. या गुन्ह्यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी सराईत गुन्हेगारांची वाढलेली ही हिंमत कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने नक्कीच घातक आहे.गुन्हेगारांबाबत ‘कानून के हाथ लंबे होते है’! असा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. नगर जिल्ह्याबाबत मात्र ‘कानून के हाथ हमारे यहाँ तो बंधे होते है’! असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांतील आणि काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर सराईत गुन्हेगारांनी जनतेसह पोलिसांनाही हैराण करून सोडले आहे़. घरफोड्या, रस्तालूट, वाहनचोरी या घटना सुरूच असताना आता भरदिवसा आणि भरचौकातून अपहरण आणि पोलिसांवर गोळीबाराच्या घटना घडू लागल्याने जनतेमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कानून के हाथ लंबे करून पोलिसांनी या सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशीच जनतेची मागणी आहे़.    नगर शहरातील सर्जेपुरा येथून १८ नोव्हेंबर रोजी अजहर मंजूर शेख या कुख्यात गुंडाच्या टोळीने प्रसिद्ध उद्योजक करीम हुंडेकरी यांचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणी मागितली़. या गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले असले तरी मुख्य सूत्रधार अजहर हा अजून फरार आहे. १९ नोव्हेंबर रोजी शहरातील क्लेरा ब्रुस विद्यालयाच्या मैदानाजवळ रस्त्यावरच एका वाहनचालकाने पिकअप वाहनात तरुणीवर अत्याचार केला. कोतवाली पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. २० नोव्हेंबर रोजी तर राहाता येथे सराईत गुन्हेगारांनी थेट पोलिसांवरच गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या घटनेत एका पोलीस कर्मचा-याला दोन गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. २५ नोव्हेंबर रोजी राहुरीत पहाटे दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुन्हेगारांनी दगडफेक केली. गेल्या आठ दिवसात एकसलग घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भरदिवसा अपहरणाच्या घटना आणि थेट पोलिसांवर गोळीबार होत असेल तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हुंडेकरी यांचे अपहरण करणारा अजहर शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधी विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. तर राहाता येथे पोलिसांवर गोळीबार करणारे आरोपी सचिन ताके व अमित सांगळे हे सराईत गुन्हेगार आहेत. प्रसिद्ध व्यक्तीचे अपहरण अथवा पोलिसांवर हल्ला या घटना एका दिवसांपुरत्या मर्यादित राहत नाहीत तर त्याचा दीर्घकाळ समाजमनावर परिणाम होत असतो़. यातून जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण होते. इतर गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक कमी होतो. यातून गुन्हेगारीच्या घटना वाढतात़ सराईत गुन्हेगारांनी पुन्हा-पुन्हा गंभीर गुन्हे करू नयेत, यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी ‘गुन्हेगारी दत्तक योजना’ ही संकल्पना जिल्ह्यात राबविली होती. शर्मा गेल्यानंतर मात्र या योजनेचे काय झाले? हे पोलिसांनाच माहिती.

 हत्यारांचाचा धाक दाखवून भरदिवसा लुटमार गुन्हेगारी जगतात लुटमारीसाठी युपी, बिहारचे उदाहरणे दिली जातात. प्रत्यक्षात मात्र नगर शहर व परिसरात त्यापेक्षाही भयानक लुटमारीच्या घटना घडत आहेत. रविवारी (दि़२४) नगर शहरात तिघा चोरट्यांनी दुपारी तीन वाजता कारचालकाचा पाठलाग करून हत्यारांचा धाक दाखवित मारहाण करत त्याच्याकडील पैशाची बॅग लंपास केली. शहर व परिसरात आठ दिवसांत किमान तीन ते चार अशा स्वरुपाच्या घटना घडत आहेत. अंगावर दागिने घालून आणि घरातून पैसे घेऊन नगर शहरात यावे की, नाही असा प्रश्न आता नगरकरांना पडला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी