शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नववीतील दीड हजार विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:15 IST

अहमदनगर : नववीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी यांच्यात तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांची तफावत आढळत ...

अहमदनगर : नववीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी यांच्यात तब्बल दीड हजार विद्यार्थ्यांची तफावत आढळत असल्याने नववीतील हे विद्यार्थी गेलेे कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांनी नववीतून शाळा सोडली की त्यांचे परजिल्ह्यात स्थलांतर झाले याची माहिती समोर आलेली नाही.

यू-डायसच्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ८१ हजार २०० विद्यार्थी नववीत होते. शासन निर्देशानुसार पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले जात नाही. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण गृहीत धरले जातात. यातून सीबीएसई बोर्डाचे ६ हजार ४९१ विद्यार्थी वजा केले तरी उर्वरित ७४ हजार ७०९ विद्यार्थी दहावी वर्गात जाणे अपेक्षित होते; परंतु पुढील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये नगर जिल्ह्यातून ७३ हजार १३९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेला होता. म्हणजे यात १५७० विद्यार्थ्यांची तफावत आढळून येते. त्यामुळे नववीतून दहावीत न आलेले हे विद्यार्थी गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांनी नववीतूनच शाळा सोडली का, ते इतर जिल्ह्यांत स्थलांतर झाले का, किंवा त्याला आणखी काही कारणे आहेत, याची माहिती समोर आलेली नाही.

-----------

जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी - ७४७०९

दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी - ७३१३९

---------------

पटसंख्येचा घोळ

नववीपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला नापास केले जात नाही. त्यामुळे पहिलीत दाखल झालेला विद्यार्थी मधल्या काळात शाळाबाह्य झाला तरी पटसंख्येसाठी तसे दाखिवले जात नाही. तो रेकाॅर्डवरच असतो; परंतु दहावीसाठी अर्ज करताना हा विद्यार्थी प्रत्यक्षात नसतोच. अशीही काही उदाहरणे आहेत. परिणामी दहावीत विद्यार्थिसंख्या आपसूकच कमी भरते, असेही काही शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-------------

शासनाच्या निर्देशानुसार पहिलीपासून नववीपर्यंत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण केले जातात; परंतु दहावीत अभ्यास करूनच उत्तीर्ण व्हावे लागते. काही विद्यार्थ्यांची पुरेशी तयारी न झाल्याने ते दहावीचा परीक्षा अर्ज भरत नाहीत. काही मुलींचे विवाह होतात, काही इतर जिल्ह्यांत जातात किंवा कामगारांच्या मुलांचे स्थलांतर होते. या कारणांमुळे दहावीत हे विद्यार्थी कमी दिसतात.

- प्राचार्य सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ

-------

नववीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले विद्यार्थी यांच्यात काही प्रमाणात तफावत आहे. त्याची काय कारणे आहेत, याचा शोध घेतला जाईल.

- रामदास हराळ, शिक्षणाधिकारी, माध्यमिक