शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावचे आठवडे बाजार कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST

अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बाजार समित्यांसह इतर जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले. आता आठवडे बाजार कधी सुरू ...

अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बाजार समित्यांसह इतर जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले. आता आठवडे बाजार कधी सुरू होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील बहुतांश भागातील आठवडे बाजार बंद झाले. एप्रिल, मे, जून असे जवळपास तीन महिने आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिकविलेली तरकारी म्हणजेच भाजीपाल्याची काेठे विक्री करायची, याचा प्रश्न होता. अनेक शेतकऱ्यांनी गावोगावी वाडीवस्त्यांवर, शहरात गल्लोगल्ली फिरून भाजीपाला विक्री केली. अनेकांना वाहतूक परवडत नसल्याने त्यांनी बांधावरच भाजीपाला फेकून दिला. काहींनी थेट पिकावरच नांगर फिरविला. काहींनी उभ्या पिकात जनावरे घातली. त्यामुळे या तीन महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

कोरोनाची लाट ओसरल्याने इतर जवळपास सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. त्यात बाजार समित्याही सुरू झाल्या. आता आठवडे बाजारही सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

---

रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला विक्री..

आठवडे बाजार बंद असल्याने लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शेतकरी शहरासह गावागावात मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा बसून भाजीपाला विक्री करीत आहेत. मात्र, येथे आठवडे बाजारसारखी पुरेशी जागा नसल्याने शेतकऱ्यांसह ग्राहकांचीही कसरत होते. अनेक ठिकाणी अपुऱ्या जागेमुळे गर्दीही होते. त्यामुळे पुन्हा कोरोना फैलावण्याचीही भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे.

---

शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प..

शेतीवर अवलंबून असलेले अनेक शेतकरी इतर पिकांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी भाजीपाला पिके घेतात. ही पिके कमी कालावधीत चांगले उत्पन्न मिळवून देतात. भाजीपाल्याची काही पिके तर अगदी एक ते दीड महिन्यात पैसे मिळवून देतात. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अशा भाजीपाला पिकांवर अवलंबून असतो. आठवडे बाजार बंद असल्याने अशा शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

-----

आम्ही वांगी, कारली, दोडके, टोमॅटो अशी तरकारी पिके घेतो. मात्र, दोन वर्षांपासून हमखास उत्पन्न मिळवून देणारी ही पिके तोट्याची ठरू लागली आहेत. यावर केलेला खर्चही निघत नाही. यासाठी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशक फवारणीसह वाहतूक खर्चही करावा लागतो. हा खर्च टाळण्यासाठी आठवडे बाजारात तरकारी विक्रीला आम्ही प्राधान्य देतो. मात्र, आठवडे बाजार बंद असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

-मच्छिंद्र शिंदे,

शेतकरी, श्रीगोंदा