शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पाणीवापर संस्था जाणार न्यायालयात

By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST

राहुरी : मुळा धरणातील उजव्या कालव्याचे एक सप्तांश हक्काचे पाणी शेतीसाठी मिळावे या मागणीसाठी २८ पाणीवापर संस्थांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुरी : मुळा धरणातील उजव्या कालव्याचे एक सप्तांश हक्काचे पाणी शेतीसाठी मिळावे या मागणीसाठी २८ पाणीवापर संस्थांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुळा डावा कालव्यांतर्गत गुरूप्रसाद कालवास्तरीय पाणी वापर संस्थेच्या बैठकीत सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २८ पाणी वापर संस्थांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा एकमुखी निर्णय घेतला़संस्थेचे अध्यक्ष दिलीप इंगळे यांंनी प्रास्ताविकात सांगितले की, डाव्या कालव्यासाठी ३५०० दलघफू पाणीसाठा राखीव असताना ऐन दुष्काळाच्या कालावधीत शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही़ त्यामुळे शेतातील खरिपाची उभी पिके जळून गेली़ सन २००५ मध्ये शासनाने पाणी वापर सहकारी संस्थांच्या स्थापनेला परवानगी दिली़ मात्र, आता शेतीसाठी पाणी नाही असे सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे इंगळे यांनी सांगितले़मुळा डाव्या कालव्याखालील शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय करण्यात आल्याचा आरोप पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केला़ पाण्यासाठी शेतकऱ्यांना अनेकदा रस्त्यावर उतरावे लागले़ मात्र त्यांना न्याय मिळाला नाही़ नियमाप्रमाणे हक्काचे पाणी मिळण्यासाठी न्यायालयीन लढाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला़ यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश करपे, राहुरी तालुका दूध संघाचे अध्यक्ष तानाजीराव धसाळ, डॉ़ दत्तात्रय वने, बाळासाहेब खुळे यांनी भाग घेतला़ बैठकीत सचिवपदी पागिरे यांची, तर सहसचिवपदी दत्तोबा वने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली़ सरपंच ज्ञानेश्वर खुळे, शिवाजी थोरात, बाळासाहेब मुसमाडे, राजेंद्र वराळे, सोमनाथ पवार, भाऊसाहेब गाडे, किशोर दौंड, पोपट पोटे, किशोर गोपाळे, मच्छिंद्र तनपुरे आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)