शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी धरणातून पाणी सोडले

By admin | Updated: August 24, 2014 01:55 IST

राहुरी/अकोले/राजूर : लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीवरून खरीप पिकांच्या जीवदानासाठी अखेर मुळा व निळवंडे धरणातून शनिवारी सायंकाळी आवर्तन सोडण्यात आले.

राहुरी/अकोले/राजूर : लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीवरून खरीप पिकांच्या जीवदानासाठी अखेर मुळा व निळवंडे धरणातून शनिवारी सायंकाळी आवर्तन सोडण्यात आले. २२ ते २५ दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून, यादरम्यान दोन्ही धरणांतून सुमारे ९ टीएमसी पाणीवापर होण्याची शक्यता पाटबंधारे खात्याकडून वर्तवली जात आहे. दरम्यान, या निर्णयामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. मुळा पाटबंधारे खात्याच्या सूचनेवरून डाव्या क ालव्यातून शुक्रवारी सकाळी ६ वाजता १५०,सकाळी ९ वाजता २००, दुपारी १२ वाजता २५०, तर दुपारी ३ वाजता ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले़ डाव्या कालव्याखाली ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळणार आहे़ त्याचबरोबर धरणाच्या उजव्या कालव्यातुनही शनिवारी सायंकाळी ७५० क्युसेकने शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले़ त्यात नंतर वाढ करण्यात येणार असून या कालव्याखाली २६००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. साधारण ३८ दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे़ लाभक्षेत्रावर पावसाने हजेरी लावली तर आवर्तनाचा कालावधी कमी होऊ शकतो़२६००० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात सध्या १९ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. लाभक्षेत्रात पाऊस झाला नाही तर दोन्ही कालव्यांतून सुमारे ६ टीएमसी पाण्याचा वापर होऊ शकतो. (प्रतिनिधी)अकोले: निळवंडे धरणातूनही शनिवारी सायंकाळी सहा वाजता शेतीसाठीचे पहिले आवर्तन सोडण्यात आले.भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी दीड महिन्याच्या उशिराने पावसाचे आगमन होऊनही पंधरा आॅगस्टपूर्वी धरण भरले. याबरोबरच निळवंडे धरणही ९० टक्क्यांहून अधिक भरले मात्र लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहिले. लाभक्षेत्रातील पिकांसाठी भंडारदरा-निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची मागणी वाढत असतानाच पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दोन दिवसांपूर्वी पाणी सुटणार असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता वीजनिर्मितीसाठी ८१६ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. याबरोबरच निळवंडे धरणाच्या पाणलोटातही मुसळधार पावसाच्या सरी बरसल्यामुळे सकाळी निळवंडे धरणातील पाणी साठ्याने सहा टीएमसीचा टप्पा पार केला होता. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून १ हजार ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. या आवर्तनात ३ टीएमसी पाणी वापरले जाण्याची शक्यता असून, हे आवर्तन सुमारे पंचवीस दिवस चालणार असल्याचा अंदाज जलसंपदाचे सहाय्यक अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. निळवंडे धरणातून पाणी सोडतेवेळी धरणात ६ हजार १०४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता.(तालुका प्रतिनिधी)