शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

Video : आम्हाला पण पर्याय नाही! म्हणत त्रस्त शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा; व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 17:24 IST

Farmer News : हताश झालेल्या शेतकरी चव्हाण यांनी शेतात साठलेल्या पाण्याशेजारी बसून आत्महत्येचा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला असून तो व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल नाही. 

ठळक मुद्दे  शिर्डीजवळ चारीच्या शेजारी चव्हाण यांची दोन एकर शेती आहे. मात्र, ऐन माशगतीच्या वेळी त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होऊन पाणी साचत असल्याने पुढील पिके घेता येत नाहीत.

अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील बापू दादा चव्हाण या शेतकऱ्याने एका व्हिडिओद्वारे आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी आत्महत्या करत नाही तर सरकारच त्याला प्रवृत्त करतं असं म्हणत त्याने हताश होऊन व्हिडीओ शूट केला. तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जलसंपदा विभागाच्या चुकीमुळे कालव्यातुन गळणारे पाणी चव्हाण यांच्या शेतात येते. गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी त्यांच्या शेतीला तळ्याला स्वरूप येते. अनेकदा पाठपुरावा करूनही कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने हताश झालेल्या शेतकरी चव्हाण यांनी शेतात साठलेल्या पाण्याशेजारी बसून आत्महत्येचा व्हिडिओ शूट करत आत्महत्येचा इशारा दिला असून तो व्हायरल होत आहे. याबाबत अद्याप कोणतीही पोलीस तक्रार दाखल नाही.  शिर्डीजवळ चारीच्या शेजारी चव्हाण यांची दोन एकर शेती आहे. मात्र, ऐन माशगतीच्या वेळी त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होऊन पाणी साचत असल्याने पुढील पिके घेता येत नाहीत. त्यातून लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची चव्हाण यांचं गाऱ्हाणं आहे. त्यांनी जलसंपदा विभागाला यासाठी जबाबदार धरले आहे. त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, चारीतून चुकीच्या पद्धतीने पाणी सोडले जाते. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून माझ्या शेतात पाणी साठते. जेथे पाणी जाऊ शकत नाही, तेथे ते बळजबरीने नेऊन इतरांची मोठमोठी शेततळी भरली जातात. त्यासाठी दीर्घकाळ पाणी सुरू राहते. त्यामुळे आपल्या शेतात पाणी साठते. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. 

उन्हाळ्यात माशगत करून पुढील पिकासाठी शेत तयार केले की, हे पाणी येते. बराच काळ हे पाणी साठून राहत असल्याने आपले मोठे नुकसान होते. यामुळे कर्जबाजारी झालो आहे. आपल्यासह आणखी काही शेतकऱ्यांना हा त्रास होत आहे. शिर्डीजवळ चारीत बिघाड झाला आहे. चव्हाण यांनी हा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, त्याच्या दुरुस्तीचे काम केले जात नाही. दरवर्षी मेहनत करून शेत तयार करायचे आणि नंतर पाणी आल्यावर नुकसान सहन करायचे, असा प्रकार सतत सुरू आहे. एकदा पाणी साठले की पुढील तीन-चार महिने हे पाणी साठून राहते. पावसाळ्यात समजू शकतो, मात्र उन्हाळ्यातही एखाद्या तळ्याप्रमाणे शेतात पाणी साठून राहत आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,' अस त्यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारच शेतकऱ्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतो असा आरोप त्यांनी केला आहे. 

 

धरणातून जेव्हा आवर्तन सुटते तेव्हा माझ्या शेतात पाणी साचते. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत जलसंपदा विभाग व तहसीलदार यांना २०१७ पासून तक्रारी करत आहे. मात्र काहीच दखल घेतली गेली नाही. मंगळवारी जलसंपदा विभागातील काही कर्मचारी शेतात आले होते. उपाययोजना करतो असे त्यांनी सांगितले मात्र अजूनतरी काहीच त्यांनी केलेले नाही. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत काहीच दखल घेतलेली नाही. - बापू चव्हाण, शेतकरी, धारणगाव ता. कोपरगाव

 

 

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगरshirdiशिर्डीfarmer suicideशेतकरी आत्महत्याIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पGovernmentसरकार