शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या वाहिन्या

By admin | Updated: October 29, 2014 23:57 IST

अहमदनगर : तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या जलवाहिन्या.... जागोजागी जलवाहिन्याखाली धुतले जाणारे कपडे.... जलवाहिन्यांना लागलेली गळती...ओव्हरफ्लो होणारे हौद... अशी दृष्ये नगरमध्ये जागोजागी दिसत आहेत.

अहमदनगर : तोट्या नसलेले नळ... छिद्र पडलेल्या जलवाहिन्या.... जागोजागी जलवाहिन्याखाली धुतले जाणारे कपडे.... जलवाहिन्यांना लागलेली गळती...ओव्हरफ्लो होणारे हौद... अशी दृष्ये नगरमध्ये जागोजागी दिसत आहेत. बदलत्या हवामानामुळे कमी झालेल्या पावसामुळे एकीकडे धरणं भरण्याची चिंता असताना दुसरीकडे मात्र आहे त्या पाण्याचा अपव्यय होत आहे.गुरुवारी (दि.३०) जागतिक काटकसर दिन आहे. पाण्याची काटकसर आता काळाची गरज बनली आहे. आगामी युद्ध पाण्यावरच होईल, अशी भाकिते तज्ज्ञांनी वर्तविली आहेत. पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्याचा हिवरेबाजारचा प्रयोग देशाला पथदर्शी ठरला आहे. मात्र हिवरेबाजारपासून जवळच असलेल्या नगर शहरात मात्र पाण्याचा अपव्यय होतो आहे. मुळा धरणातून शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. ३५ वर्षांपूर्वीची जलवाहिनी असल्याने तिला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. या गळतीमध्येच १५ ते २० दशलक्ष लीटर पाण्याची दररोज नासाडी होत आहे. जलवाहिनीला असलेली गळती रोखण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. शहरातील पाणी वितरण व्यवस्था अत्यंत जुनी आहे. त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर आहे. नगरोत्थान योजनेतील पाणी वितरण व्यवस्था सदोष आणि अपूर्ण असल्याने पाण्याची गळती रोखण्यात महापालिका प्रशासनाला अद्याप अपयशच आल्याचे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावरून दिसते आहे.शहरात तोट्या नसलेल्या नळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे लाखो लीटर पाणी रस्त्यावरून गटारीत जाते आहे. फुटक्या जलवाहिन्यांमुळे नागरिक जलवाहिनीखाली कपडे धूत आहेत. अनेक ठिकाणचे कारंजे उडत असून त्याद्वारेही पाणी वाया जात आहे. हे वाया जाणारे पाणी रोखण्याची गरज आहे.शहरात सध्या दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे एकप्रकारे पाण्याची बचतच केली जात आहे. दिवसाआड पाणी पुरवठा होत असला तरी नळाला तोट्या नसल्याने पाणी वाया जात आहे. त्यावर आगामी काळात कारवाई केली जाईल,असे मनपाचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)