शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

घारगावात नव्या राजकारणाची फुंकली तुतारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:28 IST

श्रीगोंदा : जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जिल्हा परिषदेचे ...

श्रीगोंदा : जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जिल्हा परिषदेचे सदस्य सदाशिवराव पाचपुते एकत्र आल्याने घारगावातून नव्या राजकारणाची तुतारी फुंकली गेली. जिल्हा सहकारी बँक व नागवडे साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नेते एकत्र आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

घारगाव येथे झालेल्या कार्यक्रमास नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, राजेंद्र म्हस्के, स्मितल वाबळे, बाळासाहेब महाडीक, टिळक भोस, प्रशांत दरेकर, बापू गोरे, अशोक खेंडके, दिनेश इथापे, दत्तात्रय गावडे, अशोक ईश्वरे, नारायण जगताप, लतिका जगताप उपस्थित होते. मागील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप व राजेंद्र नागवडे गटाने प्रेमराज भोयटे यांना दत्तात्रय पानसरे यांच्या विरोधात उतरविले. आमदार बबनराव पाचपुते यांच्या मदतीने पानसरेंनी जिल्हा बँकेत एंट्री केली, तेव्हापासून सहकारात गटबाजी पेटली होती. नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि राजेंद्र नागवडे यांना आव्हान दिले. जिल्हा बँक निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप व दत्तात्रय पानसरे यांच्यात लढत जवळपास निश्चित आहे. जिल्हा बँक निवडणुकीत राहुल जगताप उतरणार हे लक्षात येताच दत्तात्रय पानसरे व बाळासाहेब नाहाटा यांनी नागवडेंशी जवळीक करून राहुल जगताप यांना चेकमेट देण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत. घारगावातील कार्यक्रमातून हे स्पष्ट झाले आहे.

कोण काय म्हणाले..

पानसरेंनी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली. त्यामुळे श्रीगोंद्यात सर्वाधिक कर्जमाफी झाली.

-राजेंद्र नागवडे, अध्यक्ष, नागवडे साखर कारखाना.

..........

दत्तात्रय पानसरे हा रांगडा गडी असून जिल्हा बँकेची कार्यपद्धती त्यांनी बदलून टाकली.

सदाशिव पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य

...........

पानसरे यांनी जिल्हा बँकेत चांगले काम केले. त्याची पावती त्यांना पुन्हा मिळेल.

- भगवानराव पाचपुते, माजी उपाध्यक्ष, नागवडे साखर कारखाना

..........

दत्तात्रय पानसरे व बाळासाहेब नाहाटा यांनी राजकारणात जे ठरविले ते तडीस नेले.

-हरिदास शिर्के, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस