जिल्हा परिषदेत एकूण २३४ बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST2021-07-28T04:23:01+5:302021-07-28T04:23:01+5:30
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया २० जुलैपासून जिल्हा परिषदेत सुरू होती. पहिल्या दिवशी (दि.२०) सामान्य प्रशासन, अर्थ विभाग, तसेच ...

जिल्हा परिषदेत एकूण २३४ बदल्या
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया २० जुलैपासून जिल्हा परिषदेत सुरू होती. पहिल्या दिवशी (दि.२०) सामान्य प्रशासन, अर्थ विभाग, तसेच कृषी विभागातील ४९ जणांच्या बदल्या झाल्या, नंतर २२ जुलैला लघू पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा व पशुसंवर्धन विभागाच्या ११ बदल्या झाल्या. २४ जुलै रोजी शिक्षण विभाग, आरोग्य विभागाच्या ३४ जणांच्या बदल्या झाल्या. दि.२६ रोजी महिला बालकल्याण विभाग, ग्रामपंचायत, तसेच बांधकाम विभाग अशा एकूण ८१ बदल्या झाल्या. बदल्यांच्या अखेरच्या दिवशी दि.२७ रोजी आरोग्य विभागातील आरोग्यसेवकांच्या (महिला) ४५, आरोग्यसेवक (पुरुष) १३ व आरोग्य पर्यवेक्षक १ अशा एकूण ५९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. दि.२८ रोजी परिचर वर्गाच्या होणाऱ्या बदल्या प्रशासनाने रद्द केल्याने मंगळवारीच बदल्यांची प्रक्रिया संपली आहे. तालुकास्तरावरील बदल्या गुरुवारपासून दोन दिवस होणार आहेत. दरम्यान, यंदा बदल्यांच्या प्रक्रियेत २७ प्रशासकीय, १२५ विनंती, ८२ आपसी अशा एकूण २३४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या.