शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

“मुख्यमंत्र्यांची फसवी घोषणाच 'त्या' शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 13:03 IST

सरकार असेच जर धिम्या गतीने निर्णय घेत राहिले तर कर्जमाफी योजनेतील गोंधळामुळे गावपातळीयर उद्रेक होईल.

अहमदनगर (लोणी) : महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला असून, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा पोर्टलवर अपलोड करण्यास सुरवात झाली आहे. दुसरीकडे मात्र सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. तर शेतकऱ्याच्या आत्महत्येला ठाकरे सरकारची कर्जमाफीची फसवी घोषणा कारणीभूत असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

विखे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने कर्जाबाजारीपणाला कंटाळून केलेली आत्महत्या ही महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्जमाफी फसवी घोषणाच कारणीभूत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केली आहे.

शेतकरी आत्महत्यांना सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार आहेत. राज्यातील लोकांच्या चिंता वाढत असताना महाविकास आघाडी सरकारला मात्र सत्ता टिकवण्याची चिंता अधिक आहे. एकीकडे राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करत आहे, पण या कर्जमाफी योजनेतील कोणतीही स्पष्टता सरकार देऊ शकलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

तसेच सरकार असेच जर धिम्या गतीने निर्णय घेत राहिले तर कर्जमाफी योजनेतील गोंधळामुळे गावपातळीयर उद्रेक होईल. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार २५ हजार रुपयांची मदत करणार होते. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली होती. पण एकाही आश्वासनांची पुर्तता या सरकारकडून होत नसल्यामुळेच कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला.