शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

“मुख्यमंत्र्यांची फसवी घोषणाच 'त्या' शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 13:03 IST

सरकार असेच जर धिम्या गतीने निर्णय घेत राहिले तर कर्जमाफी योजनेतील गोंधळामुळे गावपातळीयर उद्रेक होईल.

अहमदनगर (लोणी) : महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला असून, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा पोर्टलवर अपलोड करण्यास सुरवात झाली आहे. दुसरीकडे मात्र सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. तर शेतकऱ्याच्या आत्महत्येला ठाकरे सरकारची कर्जमाफीची फसवी घोषणा कारणीभूत असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

विखे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने कर्जाबाजारीपणाला कंटाळून केलेली आत्महत्या ही महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्जमाफी फसवी घोषणाच कारणीभूत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केली आहे.

शेतकरी आत्महत्यांना सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार आहेत. राज्यातील लोकांच्या चिंता वाढत असताना महाविकास आघाडी सरकारला मात्र सत्ता टिकवण्याची चिंता अधिक आहे. एकीकडे राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करत आहे, पण या कर्जमाफी योजनेतील कोणतीही स्पष्टता सरकार देऊ शकलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

तसेच सरकार असेच जर धिम्या गतीने निर्णय घेत राहिले तर कर्जमाफी योजनेतील गोंधळामुळे गावपातळीयर उद्रेक होईल. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार २५ हजार रुपयांची मदत करणार होते. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली होती. पण एकाही आश्वासनांची पुर्तता या सरकारकडून होत नसल्यामुळेच कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला.