शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

“मुख्यमंत्र्यांची फसवी घोषणाच 'त्या' शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 13:03 IST

सरकार असेच जर धिम्या गतीने निर्णय घेत राहिले तर कर्जमाफी योजनेतील गोंधळामुळे गावपातळीयर उद्रेक होईल.

अहमदनगर (लोणी) : महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत कर्जमाफ करण्याचा निर्णय घेतला असून, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा पोर्टलवर अपलोड करण्यास सुरवात झाली आहे. दुसरीकडे मात्र सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. तर शेतकऱ्याच्या आत्महत्येला ठाकरे सरकारची कर्जमाफीची फसवी घोषणा कारणीभूत असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

विखे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मल्हारी बटुळे या शेतकऱ्याने कर्जाबाजारीपणाला कंटाळून केलेली आत्महत्या ही महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्जमाफी फसवी घोषणाच कारणीभूत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केली आहे.

शेतकरी आत्महत्यांना सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार आहेत. राज्यातील लोकांच्या चिंता वाढत असताना महाविकास आघाडी सरकारला मात्र सत्ता टिकवण्याची चिंता अधिक आहे. एकीकडे राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करत आहे, पण या कर्जमाफी योजनेतील कोणतीही स्पष्टता सरकार देऊ शकलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

तसेच सरकार असेच जर धिम्या गतीने निर्णय घेत राहिले तर कर्जमाफी योजनेतील गोंधळामुळे गावपातळीयर उद्रेक होईल. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार २५ हजार रुपयांची मदत करणार होते. सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली होती. पण एकाही आश्वासनांची पुर्तता या सरकारकडून होत नसल्यामुळेच कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला.