वांबोरी, वरवंडी येथे दोघांच्या गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 16:15 IST2019-12-11T16:15:08+5:302019-12-11T16:15:40+5:30
राहुरी तालुक्यातील वांबोरी, वरवंडी या दोन ठिकाणी दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे.

वांबोरी, वरवंडी येथे दोघांच्या गळफास घेऊन आत्महत्या
राहुरी : राहुरी तालुक्यातील वांबोरी, वरवंडी या दोन ठिकाणी दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे प्रमोद गोरक्षनाथ भोसले (वय २३, रा. ससे-गांधले वस्ती, वांबोरी) हा महाविद्यालयीन तरूण दोन दिवसांपासून बेपत्ता होता. ११ डिसेंबर रोजी सकाळी वांबोरी परिसरातील गणपती घाट येथील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच वांबोरी पोलीस ठाण्यातील हवालदार शैलेश सरोदे, अशोक तुपे व पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. प्रमोद भोसले या तरूणाचे याच परिसरातील एका तरूणीबरोबर काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. याच कारणावरून त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
दुसरी घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घडली. येथील बाळासाहेब लहानू जाधव (वय ३८) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. आहे. बाळासाहेब जाधव हे १० डिसेंबरच्या रात्री आपल्या घरात एकटेच झोपले होते. बुधवारी सकाळी उशीरापर्यंत त्यांनी घराचे दार उघडले नाही म्हणून शेजारी राहणाºया लोकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समजले. या घटनेचा तपास एस. एस. कारेगावकर हे करीत आहे. बाळासाहेब जाधव यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे. दोन्ही ठिकाणच्या घटनेतील घडलेल्या आत्महत्याचे कारण अद्याप समजले नाही. याबाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.