शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांना मिळणार १२ टक्के वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST

भेंडा : साखर कामगारांच्या वेतनवाढीप्रश्नी त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढ देण्याच्या निर्णयावर ...

भेंडा : साखर कामगारांच्या वेतनवाढीप्रश्नी त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत सर्व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर कामगारांना १२ टक्के वेतनवाढ देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. याचा फायदा राज्यातील सुमारे दीड लाख साखर कामगारांना मिळणार आहे.

या निर्णयामुळे साखर कामगारांना ३० महिन्यांचा फरक मिळणार आहे. मूळ पगाराच्या १२ टक्के अशा प्रकारे सरासरी २१०० ते २६०० रूपयांची वेतनवाढ साखर कामगारांना मिळणार आहे. याशिवाय वैद्यकीय भत्ता, धुलाई भत्ता, रात्रपाळी भत्ता, घरभाडे भत्ता यातही वाढ होणार आहे.

पुण्यातील साखर संकुलात त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या समितीच्या बैठकीत साखर कामगारांना १ एप्रिल २०१९ पासून १२ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय झाला.

बैठकीला साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, सदस्य सचिव आयुक्त रविराज इळवे, साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, प्रकाश आवाडे, राजेंद्र नागवडे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, साखर कामगार संघटना प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशन (इंटक)चे अध्यक्ष अविनाश आदिक, सरचिटणीस नितीन पवार, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉ. सुभाष काकुस्ते, चिटणीस कॉ. आनंद वायकर, अशोक बिरासदार, राऊसाहेब पाटील, शंकरराव भोसले, सुरेश मोहिते, डी. डी वाकचौरे, योगेश हंबीर आदी उपस्थित होते.

साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०१९ रोजी संपली होती. त्यानुसार वेतनवाढ देण्यासाठी त्रिपक्षीय समिती गठित करून ४० टक्के वेतनवाढ व इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी राज्यातील साखर कामगार संघटनांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनाने त्रिपक्षीय समिती गठीत करून आजपर्यंत ४ ते ५ बैठका झाल्या. परंतु, तोडगा न निघाल्याने माजी कृषीमंत्री शरद पवार यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार पवार यांनी साखर कारखानदार व साखर कामगार प्रतिनिधींशी चर्चा करून १२ टक्केपर्यंत वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निर्णय घेतल्याने राज्यातील साखर कामगारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.