शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

भंडारदरा धरणाचे उन्हाळी आवर्तन बंद

By admin | Updated: March 26, 2024 15:17 IST

अकोले : भंडारदरा धरणातून लाभक्षेञासाठी सुरू असलेले शेतीचे आवर्तन शनिवारी बंद झाले.

अकोले : भंडारदरा धरणातून लाभक्षेञासाठी सुरू असलेले शेतीचे आवर्तन शनिवारी बंद झाले. २४ दिवस चाललेल्या या आवर्तनात ३ हजार २०० दलघफू पाणी वापरात आले. भंडारदरा धरणात १ हजार ७११ दलघफू पाणी शिल्लक आहे. २३ एप्रिल रोजी भंडारदरा धरणातून सिंचनासाठी १ हजार ७०० क्युसेक वेगाने आवर्तन सोडण्यात आले. आवर्तन सुरू होताना भंडारदरा धरणात ४ हजार ४९८ दलघफू पाणीसाठा होता, तर निळवंडेत ७०३ दलघफू पाणी होते. २४ दिवस चाललेल्या आवर्तनासाठी भंडारदरा जलाशयातून ३ हजार २०० दलघफू पाणी खर्ची पडले. आता निळवंडेत २९० दलघफू, तर भंडारदरा धरणात १ हजार ७११ दलघफू पाणी शिल्लक असून राजूर पाणीपुरवठा योजनेसाठी भंडारदर्‍यातून निळवंडेत काही प्रमाणात पाणी सोडले जात आहे. राजूर योजनेच्या विहिरीपर्यंत पाणीसाठा निळवंडेत झाल्यानंतर चार दोन दिवसांनी भंडारर्‍याची मोरी बंद होणार आहे. निवडणुकी मुळे आवर्तनाकडे लक्ष गेले नसले तरी दिर्घकाळ चाललेल्या आवर्तनामुळे लाभक्षेञातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. आढळा मध्यम प्रकल्पात आजअखेर १७४ दलघफू पाणीसाठा असून बुडित क्षेञाबरोबरच हिवरगाव, डोंगरगाव, पाचगाव पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी राखून ठेवण्यात आल्याचे समजते. सलग पाच वर्षे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही, तसेच आढळा खोर्‍यातील भूजल पातळी खोल गेल्यामुळे आवर्षणप्रवण क्षेञ दुष्काळाच्या झळा सोसत आहे. माञ पिंपळगाव निपाणी, विरगाव, गणोरे, हिवरगाव भागातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात शेततळे केल्याने शेतीतील फळबागांना चांगला लाभ होत आहे. (तालुका प्रतिनिधी)