शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST

अहमदनगर : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र पद्मश्री ...

अहमदनगर : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र पद्मश्री पोपटराव पवार यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू यांना पाठविले आहे.

हिवरे बाजार (जि. अहमदनगर) या आदर्श गावात लोकांचा सहभाग व सामाजिक शिस्त असल्यामुळे हे गाव कोरोनामुक्त झालेले असून त्याच अनुभवातून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावातील शाळा सुरू केली आहे. विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व ग्रामपंचायत यांनी स्वत:च्या जबाबदारीवर १५ जून २०२१ पासून ५ वी ते ७ वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इ. ८ ते १० वी यशवंत माध्यमिक विद्यालय सुरू केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी अतिशय आनंदी आहेत. गेले ८ दिवस कुठल्याही प्रकारची अडचण जाणवली नाही.

हिवरे बाजार हे गाव १५ मे २०२१ रोजी कोरोनामुक्त झाले. त्यात कोरोना सुरक्षा मुख्य समितीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक काम करीत होते. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्याशी शिक्षकांचा संवाद चालूच होता. गावातील सर्व्हेतून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारी स्वीकारून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जी गावे, वाड्या, वस्त्या व पाडे यामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही तसेच जी गावे उत्तम नियोजनातून कोरोनामुक्त झालेली आहेत, अशा ठिकाणी कोरोनाविषयक जबाबदारी पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी घेतल्यास शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पवार यांनी या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

...........

मुले विसरली लिखाण, वाचन

१६ ते ३० मे या कालावधीत प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थी व पालक सर्व्हे करून प्रत्यक्षात चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. त्यातून असे लक्षात आले की, विद्यार्थी लिखाण, वाचन विसरून गेलेले आहेत. ग्रामीण भागात ऑनलाईन अभ्यासक्रमात इंटरनेट व त्या अनुषंगिक इतर सोयी-सुविधा नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

.......................