शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी चोरी करणारे सात जण पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST

तिसगाव : पाथर्डी व नगर तालुक्यातील ३३ गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या मुख्य पाईपलाईन मधूनच पाणी चोरी ...

तिसगाव : पाथर्डी व नगर तालुक्यातील ३३ गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या मुख्य पाईपलाईन मधूनच पाणी चोरी करणाऱ्या सात व्यक्तींना या योजनेच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला.

यामध्ये कात्रड येथे सहा जण तर उदलमल येथील एक अशा सात व्यक्तींनी मुख्य पाईपलाईनला अनधिकृतपणे कनेक्शन घेऊन पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी ही हे पाणी वापरत होते. पाऊस लांबल्याने या योजनेंतर्गत येणाऱ्या अनेक गावांची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता तसेच तिसगाव-मिरी सारख्या टेलच्या गावांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः गेल्या काही दिवसांपासून या योजनेमध्ये विशेष लक्ष घालून या योजनेचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.

या योजनेमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर केल्या. मुळा धरणापासून पांढरीपूल पर्यंत मुख्य पाईपलाईन व एअर वॉलमधून काही पाणी चोरी होत आहे का? एअर वॉल लिक आहेत का? याची खातरजमा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. मागणीनुसार प्रत्येक लाभधारक गावाला पिण्याचे पाणी पूर्ण दाबाने मिळालेच पाहिजे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. पाईपलाईन मधून कोणी अनधिकृतपणे पाणी चोरी करताना आढळून आल्यास तो कोणत्याही पक्षाचा, पार्टीचा असू द्या त्याच्यावर कारवाई करा. असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे योजनेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही तत्काळ पाणी चोरी शोधणे सुरू केले.

शुक्रवारी कात्रड येथे सहा जण मुख्य पाईपलाईन मधून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी घेत असल्याचे आढळून आले. तर उदलमल येथे एकजण या योजनेचा एअर वॉल नादुरुस्त करून पाणी घेत असल्याचे आढळले, अशी माहिती या योजनेचे सचिव ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब सावंत व नितीन काचोळे यांनी दिली.

---

‘त्या’ व्यक्तींवर फौजदारी दाखल करणार

मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या पाईपलाईन व एअर वॉल मधून अनधिकृतपणे कनेक्शन घेणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कोणीही मुख्य पाईपलाईन अथवा एअर वॉलची छेडछाड करून नये, असे आवाहन या योजनेचे सचिव भाऊसाहेब सावंत यांनी केले आहे.