शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

अगस्तीच्या कर्जाचा बोजा पाहून पवारांनी व्यक्त केली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्यावरील कर्जाचा बोजा पाहून दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच चिंता व्यक्त केली असून ...

अकोले : अगस्ती सहकारी साखर कारखान्यावरील कर्जाचा बोजा पाहून दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच चिंता व्यक्त केली असून कारखाना ताब्यात घेताना सर्व आर्थिक बाबींचा विचार करा. सभासद शेतकऱ्यांना ही बाब समजून सांगा. ऊस उत्पादकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला दिला. दरम्यान कारखाना ताब्यात घेवून तो कर्ज फेडीत बंद पडला तर ? याचे खापर आपल्या माथी नको म्हणून साखर कारखाना ताब्यात घेण्यासाठी सरसावलेली मंडळी थोडी थंडगार झाल्याचे सध्या चित्र आहे.

पूर्वी संपत कमिशनचे फायदे घेऊन अगस्ती साखर कारखाना कर्ज मुक्तीच्या उंबरठ्यावर होता, पण गेल्या पाच वर्षांत ३२४ कोटी कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने सध्या अगस्ती आर्थिक अडचणीत असल्याचे कागदपत्रे समोर आले. ५० कोटींचा इथेनॉल प्रकल्प व ५२ कोटींची साखर मालमत्ता दिसते. २२० कोटी कर्ज हे अनावश्यक खर्च झाले असून कोणत्याही स्वरूपाची स्थावर मालमत्ता निर्माण झाली नाही असा आरोप होत असून ही कागदपत्रे घेवून तालुक्यातील शिष्टमंडळाने थेट ऊस साखर कारखानदारीतील जाणते नेतृत्व शरद पवार यांची पंधरवड्यापूर्वी तर गत आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात शेतकरी नेते दशरथ सावंत, आमदार डॉ.किरण लहामटे, जेष्ठ नेते अशोक भांगरे, निवृत्त सनदी अधिकारी बी. जे. देशमुख, विनय सावंत, सुरेश गडाख, भानुदास तिकांडे यांचा समावेश होता.

१४१ कोटी मालमत्ता त्यावर ३२४ कोटी कर्ज असून यंदा किमान ७६ कोटी रुपयांची परतफेड अगस्ती कसा करणार ? असा सवाल यावेळी उपस्थित केला गेला आहे. साखर संकुल व वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शरद पवार यांनी अगस्तीच्या कारभाराची, कर्जाची, कर्ज परतफेडीची माहिती जाणून घेतली व अगस्ती बाबत चिंता व्यक्त केली आहे. कर्ज मिळाले. सरकार पाठिशी उभे राहिल, पण कर्ज फेडण्यासाठी काय कराल ? शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये. शेतकऱ्यांपर्यंत जा आणि कारखान्याची आर्थिक स्थिती समजून सांगा. उगाच घाईगडबडीत निर्णय घेऊ नका असा सल्ला पवार यांनी दिल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची याच शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली. दोन्ही ठिकाणी चर्चेचा एक सूर निघाला. अगस्ती कारखाना आर्थिक अडचणीत असून आपली कामधेनू म्हणून गेली ३० वर्षे सातत्याने तालुक्यातील ऊस उत्पादकांनी शेजारील कारखान्यांच्या तुलनेत कमी भाव घेतला आहे.

............

सारासार विचार करून पाऊल टाकावे

स्थावर मालमत्ता कमी, मात्र बोजा वाढवून प्रचंड कर्ज कारखान्यांने घेतले, त्याची परतफेड सभासदांचे नुकसान करणारीच आहे. शेतकरी आणखी किती नुकसान सहन करणार आणि कारखाना विरोधी मंडळीच्या हाती आला तर फरक पडेल का ? याबाबत सारासार विचार करूनच पाऊल उचलायचा हवे असे मत विनय सावंत यांनी व्यक्त केले.

दरम्यान आर्थिक परिस्थिती पाहूनच कर्ज मिळते. अगस्ती कारखान्याकडे कर्ज परतफेड करण्याची क्षमता असून कारखाना आर्थिक डबघाईस गेलेला नाही, असा निर्वाळा यापूर्वीच कारखाना प्रशासनाने दिला आहे.

...................

२४ जानेवारी रोजी शरदचंद्र पवार अकोले दौऱ्यावर येत असून भंडारदरा (शेंडी) येथे दिवंगत आमदार यशवंतराव भांगरे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. यशवंतराव हे पवार सहकारी होते. या दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष लागून असून या दिवशी कारखान्याच्या निवडणूकी संदर्भाने अआश्वासक चित्र समोर येण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर यांचेसह सहकारातील नेते पुन्हा राष्ट्रवादीत दाखल होतील? अशी चर्चा आहे.

दरम्यान संक्रातीच्या पूर्वसंध्येला बुधवारी भाजपचे चंद्रशेखर कदम यांनी अकोलेत येवून सिताराम गायकर यांची भेट घेतली.