शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

अहमदनगरच्या पर्यटन विकासाबाबत शासनाला आराखडा देणार- संग्राम जगताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:34 IST

अहमदनगर : नगर शहराच्या पर्यटन विकासाबाबत नागरिकांसोबत चर्चा करुन शासनाला सर्वांगीण आराखडा सादर केला जाणार आहे. पुढील काळात हरित नगर व पर्यटनासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

अहमदनगर : नगर शहराच्या पर्यटन विकासाबाबत नागरिकांसोबत चर्चा करुन शासनाला सर्वांगीण आराखडा सादर केला जाणार आहे. पुढील काळात हरित नगर व पर्यटनासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

नगरच्या पर्यटन विकासाबाबत जगताप यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली आहे. या निधीसाठी शासनाकडे आराखडा सादर करावयाचा आहे. हा आराखडा सादर करण्यासाठी जगताप व रसिक ग्रुपचे संस्थापक जयंत येलूलकर यांच्या पुढाकारातून शनिवारी निमंत्रित व्यक्तींची एक बैठक बोलविण्यात आली होती. 

या बैठकीत अवतार मेहरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर, प्रकाश छजलानी, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे, महेंद्र कुलकर्णी, आदेश चंगेडिया, गौतम मुनोत, रफिक मुन्शी, प्रियदर्शन बंडेलू, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष सलीम शेख, मेहेर तिवारी, स्वप्नील मुनोत, सीताराम काकडे, विशाल लाहोटी, नगरसेवक गणेश भोसले, श्रीनिवास बोज्जा, नगर रायझिंगचे संदीप जोशी, पुष्कर तांबोळी आदींनी नगरच्या पर्यटन विकासाबाबत विविध सूचना   मांडल्या.  जगताप म्हणाले, नगर शहर कचराकुंडीमुक्तीकडे वाटचाल करत आहे. स्वच्छतेतही आपण चांगली प्रगती करत आहोत.

आपण विधानसभेत प्रश्न मांडल्यानंतर सीनानदी अतिक्रमण मुक्त होत आहे. पर्यटन विकास होण्यासाठी आता सरकारकडे आराखडा सादर केला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांची मते विचारात घेणार आहोत. पर्यटन व सांस्कृतिकदृष्ट्या शहर संपन्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रारंभी येलूलकर यांनी बैठकीमागील हेतू विशद केला. माणिक विधाते, अण्णाशेठ मुनोत, भूषण देशमुख, संजय चोपडा, श्रीकांत मांढरे, रमेश जंगले, सुदर्शन कुलकर्णी, ऋषीकेश येलूलकर यांची उपस्थित होती. 

मान्यवरांनी सूचविले  विविध प्रकल्प पर्यटन विकासासाठी बैठकीत विविध सूचना मांडण्यात आल्या. पर्यटकांना आकर्षितकरण्यासाठी शहरात स्वच्छता बाळगावी. पर्यटनस्थळांच्या विकासाबाबत अभियंते, वास्तुविशारद तसेच नागरिकांकडून मते व कल्पना मागवाव्यात. आमदार व खासदार निधीतील काही हिस्सा ठरवून पर्यटन विकासावर खर्च करावा. भुईकोट किल्ला सुशोभित करुन तेथे लेझर शो व उद्यान विकसित व्हावे. शहरातील चौक लोकसहभागातून सुशोभित करावेत. दरवर्षी एक ापर्यटनस्थळावर लक्ष केंद्रित करुन त्याचा सर्वांगीण विकास करावा. सिनेमा व मालिकांच्या चित्रीकरणासाठी नगर शहराजवळ चित्रनगरी निर्माण करावी. पर्यटन विकासाबाबत जगभर असणाºया नगरकरांची मदत घ्यावी, आदी सूचनांचा त्यात समावेश आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरtourismपर्यटन