शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी रास्तारोको

By admin | Updated: June 3, 2014 00:27 IST

शेवगाव : शहरटाकळी व २६ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्यामुळे या योजनेवरील लाभार्थ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे़

शेवगाव : शहरटाकळी व २६ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्यामुळे या योजनेवरील लाभार्थ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे़ ही योजना सुरु करावी, ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आदी मागण्यांसाठी शेवगाव-नेवासा मार्गावर भातकुडगाव फाटा येथे रास्तारोको करण्यात आला़ प्रशासनाच्या निषेधार्थ महिलांनी रिकामे हंडे घेऊन रस्त्यावरच ठाण मांडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ सुमारे ६० हजार लाभार्थी नागरिकांची तहान भागविणार्‍या शहरटाकळी व २६ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा थकीत वीजबिलाअभावी बंद झाला आहे़ या योजनेवर १८ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे़ या बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने १८ फेब्रुवारीपासून या योजनेवरील वीज जोड तोडला आहे़ त्यामुळे एैन उन्हाळ्यात तब्बल साडेतीन महिन्यापासून योजना बंद अवस्थेत आहे़ त्यामुळे लाभार्थी गावांच्या ग्रामस्थांना न भुतो न भविष्यती अशा स्वरुपाच्या तीव्र पाणी टंचाईचा मुकाबला करावा लागत आहे. शहरटाकळी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करावी, टंचाईग्रस्त गावाना टँकर सुरू करावेत आदी मागण्यासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वाय. डी. कोल्हे, अशोक निंबाळकर, विलास फाटके आदींच्या नेतृत्वाखाली शेवगाव-नेवासा महामार्गावरील भातकुडगाव फाटा येथे सोमवारी रास्तारोको करण्यात आला़ आंदोलकांनी सुमारे तास भर राजमार्गावरील वाहतूक रोखून धरीत पाणी टंचाईबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. शहरटाकळीसह शेवगाव-पाथर्डी सह ५४ गावे तसेच बोधेगाव, बालमटाकळी सह ८ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांनाही यंदाच्या उन्हाळ्यात विविध अडचणीचे ग्रहण लागले आहे. शहरटाकळी व २६ गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यंदाच्या उन्हाळ्यात सलग ८ दिवस एकदाही सुरू राहिली नाही. कधी वीज बिल तर कधी पाणीपट्टी थकल्याचे कारण दाखवून बिलाच्या वसुलीसाठी योजना सातत्याने बंद राहिली़ त्यामुळे सुमारे ६० हजार लाभार्थी नागरिकांच्या तोंडचे पाणी महावितरण आणि जिल्हा प्रशासनाने हिरावल्या आरोप यावेळी आंदोलकांनी केला़ जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता बबन खोले, चंद्रकांत दहीफळे यांनी जि.प. देखभाल दुरुस्ती फंडातून रक्कम उपलब्ध करून योजना तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़ शुक्रवार (दि़६) पर्यंत योजना सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वाय. डी. कोल्हे दिला़ यावेळी गंगा खेडकर, मोहन लोंढे, बाळासाहेब सामृत, लक्ष्मण काशिद, आसाराम नरे, अण्णासाहेब सुकासे, राजेंद्र खंडागळे, संतोष आढाव, भाऊसाहेब जाधव आदी कार्यकर्त्यांनी पाणी टंचाईच्या समस्येबाबत प्रशासनावर टीकेची झोड उठविली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग चौगुले, पो.उपनिरीक्षक केशव राठोड यांनी चोख बंदोबस्त ठेवला. (तालुका प्रतिनिधी)पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील कान्होबावाडी येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, या गावातील महिलांना सध्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कान्होबावाडी गावासाठी प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. मात्र आठ दिवसानंतर एक खेप टँकरची या वाडीसाठी दिली जाते. त्यामुळे नुसता नावापुरताच टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. कान्होबावाडी येथील ग्रामस्थांना गेली दोन वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा संघर्ष करावा लागत आहे. मागील वर्षी वारंवार मागणी केल्यानंतर या गावचा रस्त्याचा प्रश्न जि.प. उपाध्यक्षा मोनिका राजळे यांच्या माध्यमातून मार्गी लागला़ मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप रखडला आहे. कान्होबवाडीसाठी दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.